शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या स्मार्ट सिटीला गती देण्याचे आव्हान

By admin | Updated: March 6, 2017 02:11 IST

स्मार्ट सिटी कार्पोरेशन ही स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून ५ वर्षांत शहर स्मार्ट बनविण्याचे स्वप्न पुणेकरांना दाखविण्यात आले.

पुणे : महापालिकेची यंत्रणा वेगाने काम करू शकत नाही म्हणून स्मार्ट सिटी कार्पोरेशन ही स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून ५ वर्षांत शहर स्मार्ट बनविण्याचे स्वप्न पुणेकरांना दाखविण्यात आले. मात्र वर्ष उलटले तरी अद्याप या योजनेअंतर्गत एकही मोठा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आलेला नाही. नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपासमोर आता या रखडलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांना गती देण्याचे आव्हान असणार आहे. केंद्रात, राज्यात व आता महापालिकेतही भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्याने स्मार्ट सिटीची कामे रखडल्याचे खापर त्यांना आता कोणावरही फोडता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेसाठी देशभरातून स्पर्धा घेऊन पहिल्या टप्प्यात २८ जानेवारी २०१६ रोजी २० शहरांची निवड करण्यात आली आहे. पुणे शहराची यामध्ये दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली. शहरामध्ये औंध-बालेवाडी-बाणेर हा भाग मॉडेल एरिया म्हणून विकसित करायचा, वाहतूक यंत्रणा सक्षम करायची, २४ तास पाणीपुरवठा करायचा यांसह अनेक मोठी स्मार्ट स्वप्ने या योजनेतून दाखविण्यात आली आहेत. त्यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, स्मार्ट सिटीच्या मोठ्या प्रकल्पांची आतापर्यंत केवळ टेंडर काढण्याइतपत प्रगती झालेली आहे.महापालिकेच्या ताठर प्रशासनाकडून वेगाने विकासकामे होत नाहीत, त्यामुळे खासगी कंपनी स्थापन करून शहर स्मार्ट बनवायचे या मूलभूत संकल्पनेवर स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे २८ जानेवारीला स्मार्ट शहरांची निवड झाल्यानंतर वर्षभरात प्रचंड काम उभं राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना व्हायला मार्च महिना उजाडला. या कंपनीसाठी अजूनही स्वतंत्र कार्यालय उपलब्ध झालेले नाही. त्याचबरोबर स्मार्ट सिटीतील महत्त्वाच्या पदांसाठी जाहिरात देऊन त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नगररपालिका, विधान परिषद व महापालिका निवडणुकांच्या आचारसंहिता लागल्याने स्मार्ट सिटीच्या कामांना त्याचा मोठा फटका बसला आहे. (प्रतिनिधी)5वर्षांत ३ हजार कोटी रुपयांची कामे स्मार्ट सिटी योजनेच्या आराखड्यानुसार पार पाडली जाणार आहेत. स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने काही टेंडर काढण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील सिग्नलची व्यवस्था सुधारणे व कमांड कंट्रोल सेंटर उभारणे या प्रमुख दोन टेंडरचा समावेश आहे. >४ वर्षांत रिझल्ट दाखवावे लागणारस्मार्ट सिटी योजनेंतर्गत औंध-बालेवाडी-बाणेर हा भाग मॉडेल एरिया म्हणून विकसित करायचा, वाहतूक यंत्रणा सक्षम करायची, २४ तास पाणीपुरवठा करायचा यांसह अनेक मोठी स्मार्ट स्वप्ने ५ वर्षांत पूर्ण करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. योजनेची सुरुवात होऊन आता १ वर्ष उलटले असून, त्यामध्ये फारशी प्रगती झालेली नाही. उर्वरित ४ वर्षांमध्ये भाजपाला प्रत्यक्ष काम करून त्याचे रिझल्ट दाखविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळात भाजपाचे वर्चस्वस्मार्ट सिटीच्या संचालक मंडळामध्ये आता भाजपाकडून महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृहनेता आदींना प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्याचबरोबर राज्य शासनाचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश या संचालक मंडळात प्रामुख्याने असणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेची सर्व सूत्रे आता भाजपाच्या हातात केंद्रित असणार आहेत.>औंधमधील रस्त्याचा प्रयोग फसलास्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध-बाणेर-बालेवाडीमध्ये नदीसुधारणा, सोलर एनर्जी, स्मार्ट मीटरिंग, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांचे सुसूत्रीकरण, वाहनतळ, देखभाल दुरुस्ती, पाण्याचा पुनर्वापर आदी प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्याचे काम कधी सुरू होणार, असा प्रश्न तिथल्या स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.