शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

आमदारांच्या वेतनवाढीला उच्च न्यायालयात आव्हान

By admin | Updated: August 9, 2016 04:18 IST

राज्य सरकारवर ३१ मार्च २०१६पर्यंत ३ लाख २९ हजार कोटी रुपये कर्ज असताना राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात आमदारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेऊन

मुंबई : राज्य सरकारवर ३१ मार्च २०१६पर्यंत ३ लाख २९ हजार कोटी रुपये कर्ज असताना राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात आमदारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेऊन सरकारला कर्जाच्या दरीत लोटले आहे, त्यामुळे राज्य सरकारचा आमदारांचे वेतन आणि निवृत्तिवेतन वाढवण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ५ आॅगस्ट रोजी राज्य सरकारने विद्यमान आमदारांचे वेतन दीड लाखावरून दोन लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला, तर आमदारांच्या निवृत्तिवेतनातही भरघोस वाढ करण्याचे जाहीर केले. मात्र यामुळे सरकारच्या तिजोरीवर ७९ हजार ९४१ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तर निवृत्तिवेतन म्हणून २४ हजार ७३० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. राज्य सरकारवर ३१ मार्च २०१६पर्यंत ३ लाख ७९ हजार कोटी रुपये कर्ज आहे. त्यावरील व्याज म्हणून सरकारला दरवर्षी २८ हजार २२० कोटी रुपये भरावे लागत आहेत. असे असतानाही राज्य सरकार आमदारांच्या वेतनात आणि निवृत्तिवेतनात प्रचंड वाढ करत आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे. याचिकेनुसार, सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, अशी सबब पुढे करून महापालिकेचे तीन हजार शिक्षक, पोलीस व अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. तर सकरारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार, वेतन देण्यास विलंब करत आहे. तरीही सरकारने आमदारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला. हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात केली. (प्रतिनिधी)