शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या विचारसरणीचा प्रसार रोखणे हेच आव्हान

By admin | Updated: March 13, 2016 05:03 IST

देशात सामाजिक विषमता वाढविण्याचे काम सुरू आहे. या विषमतेला जबाबदार असलेली भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारसरणी वाढविण्यासाठी पोषक

पुणे : देशात सामाजिक विषमता वाढविण्याचे काम सुरू आहे. या विषमतेला जबाबदार असलेली भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारसरणी वाढविण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती केली जात आहे. ती रोखणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले. राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने घरेलू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस भवन येथे पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे, अनंतराव गाडगीळ, दीप्ती चौधरी, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजीत कदम, शहर काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, उपमहापौर मुकारी अलगुडे आदी या वेळी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, केंद्रात आणि राज्यात अराजकता माजली आहे. विद्यार्थी, कामगार, महिला तसेच अल्पसंख्याकांचे आवाज दडपण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे देशात असहिष्णुता आणि विषमता वाढत आहे. यामागे आरएसएसची विचारसरणी आहे. ती रोखण्याचे आव्हान असून, त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे यावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. घरेलू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस भवन येथे पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)शिर्डी : मन की बात जाऊ द्या, ती मतांसाठी आहे. आपण मात्र लोकांच्या दिल की बात समजावून घ्या, जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेत त्यांच्यासाठी एकत्रितपणे आंदोलन करावे लागेल, असा सल्ला देत सध्या भाजपा व संघावाले मेक इन इंडियाच्या नावाखाली देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करीत आहेत, अशी टीका अशोक चव्हाण यांनी शिर्डीत केली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या दोन दिवसीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अध्यक्षस्थानी होते. भाजपा सरकार देशात भीतीचे वातावरण निर्माण करून आपली वोट बँक निर्माण करीत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला़