शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

मीटर रिकॅलिब्रेशनचे आव्हान

By admin | Updated: May 13, 2015 01:58 IST

रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने घेतला आहे. मात्र जोपर्यंत रिक्षा-टॅक्सींच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन

मुंबई : रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने घेतला आहे. मात्र जोपर्यंत रिक्षा-टॅक्सींच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन (मीटरमध्ये भाडेबदल) होत नाही, तोपर्यंत ही भाडेवाढ लागू होणे अशक्य आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भार्इंदर, उल्हासनगरसह अन्य एमएमआरडीए क्षेत्रात जवळपास साडेतीन लाख रिक्षा-टॅक्सी असून, अवघे १९ दिवस रिकॅलिब्रेशनसाठी आरटीओला मिळत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी आरटीओकडून प्रयत्न केले जाणार आहेत. रिक्षा-टॅक्सींची भाडेवाढ हकिम समितीच्या शिफारसीनुसार केली जात असून, २७ जुलै २0१२ रोजी ही शिफारस लागू करण्यात आली. त्यानंतर याच समितीच्या शिफारसीनुसार आतापर्यंत भाडेवाढ करण्यात आली आहे. एमएमआरडीएने आता रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात १ जूनपासून १ रुपया भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रिक्षाचे भाडे १७ रुपयांवरून १८ रुपये तर टॅक्सीचे भाडे २१ रुपयांवरून २२ रुपये होईल. मात्र त्यासाठी रिक्षा-टॅक्सीचालकांना मीटरचे रिकॅलिब्रेशन करणे गरजेचे असल्याचे आरटीओ अधिकारी सांगतात. जोपर्यंत मीटरमध्ये नवीन भाड्यासाठी बदल केला जात नाही, तोपर्यंत नवीन भाडे रिक्षा-टॅक्सीचालक आकारू शकत नाहीत. त्यामुळे रिकॅलिब्रेशन होणे गरजेचे असून, तेच मोठे आव्हान असल्याचे आरटीओतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. एमएमआरडीए क्षेत्रात सध्या रिक्षा-टॅक्सींची संख्या ही जवळपास साडेतीन लाख एवढी आहे. तर रिकॅलिब्रेशनसाठी हातात १९ दिवस शिल्लक असून, या दिवसांत मीटरमध्ये बदल करून १ जूनपासून नवीन भाड्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आता दोन दिवसांत हायकोर्टात भाडेवाढीची माहिती दिल्यानंतर सर्व आरटीओ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली जाईल. या बैठकीत रिकॅलिब्रेशन लवकरात लवकर करण्यासाठी नियोजन केले जाईल. त्यानंतर यासंदर्भात सर्व रिक्षा-टॅक्सी संघटनांसमवेतही बैठक घेण्यात येईल आणि चालकांकडून रिकॅलिब्रेशन करण्यासाठी त्वरित प्रतिसाद मिळावा यावर नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. साधारण ४५ दिवस रिकॅलिब्रेशनसाठी लागणार असले तरी त्यापेक्षा जास्त दिवसही लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.