शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

फौजिया खान यांच्या मंत्री पदाला आव्हान

By admin | Updated: June 6, 2014 01:29 IST

मुदत संपल्यानंतर त्यांची आमदार म्हणून निवडही झाली नाही अथवा त्यांना नव्याने मंत्रीपदाची शपथही देण्यात आली नाही,

मुंबई : राज्यमंत्री फौजिया खान यांच्या आमदारकीची मुदत संपल्याने आपोआपच त्यांचे मंत्रिपद रद्द झाले. मुदत संपल्यानंतर त्यांची आमदार म्हणून निवडही झाली नाही अथवा त्यांना नव्याने मंत्रीपदाची शपथही देण्यात आली नाही, असा दावा करत विरोधकांनी खान यांच्या मंत्री पदावर तसेच सभागृहातील त्यांच्या उपस्थितीबद्दल आक्षेप घेतला. 
गुरुवारी उपस्थित करण्यात आलेल्या तारांकीत प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्या उभ्या राहिल्या. तेंव्हा शिवसेना गटनेते दिवाकर रावते यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत त्यांना रोखले. आमदारकीची मुदत संपल्यानंतरही मंत्रीपदी कायम राहायचे असल्यास संबंधित सदस्याला सहा महिन्यांच्या आत पुन्हा निवडून यावे लागते. अथवा शासनाने सदस्याला किमान पदाची आणि गोपनीयतेची शपथ द्यावी लागते. मात्र, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्याबाबत दोन्हीही न घडल्याने त्या आज प्रश्नोत्तरांच्या तासात उत्तरे देण्यास पात्र नाहीत, असा दावा रावते यांनी केला. 
शेकापचे जयंत पाटील यांनीही त्यास समर्थन देत खान यांना पुन्हा शपथ देण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही नेमक्या कलमाची मागणी करत सभापतींना त्याविषयी निर्णय देण्याची विनंती केली. तर आमदारकी संपल्यानंतर त्यासोबत येणारे सर्व विशेषाधिकारही रद्दबातल ठरतात. त्यामुळे जोर्पयत खान यांचे मंत्रिपद रद्द झाल्याचा युक्तीवाद भाजपाचे आशिष शेलार यांनी केला.
मात्र, सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांनी याला प्रतिवाद केला. विधानसभा अथबा परिषदेचे सदस्य नसणा:या व्यक्तीला सहा महिन्यार्पयत मंत्री म्हणून काम करता येते. तशी कायदेशीर तरतूद आहे. माजी मंत्री दयानंद म्हस्के सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर सहा महिने मंत्री होते, असा दावा भाई जगताप, हेमंत टकले, प्रकाश बिनसाळे तसेच कपिल पाटील यांनी केला.
विरोधकांनी नियमांचा आधार घेत आक्षेप घेतला. मुदत संपलेल्या सदस्याच्या मंत्री पदाबाबत स्पष्टता होऊ शकल्याने बारकाईने अभ्यास करुन याबाबतचा निर्णय देवू. मात्र तोर्पयत फौजिया खान सभागृहात बसू शकतात, असा निर्णय सभापतींनी दिला. त्यांच्या या निर्णयावर संतप्त विरोधकांनी सभात्याग केला. (प्रतिनिधी)