शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मुख्यमंत्र्यांसह नऊ आमदारांच्या निवडणुकीला आव्हान

By admin | Updated: June 17, 2015 03:38 IST

विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. मिलिंद माने, डॉ. देवराव होळी, कीर्तीकुमार भांगडिया, राजू तोडसाम, सुनील केदार

राकेश घानोडे, नागपूरविधानसभा निवडणुकीत विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. मिलिंद माने, डॉ. देवराव होळी, कीर्तीकुमार भांगडिया, राजू तोडसाम, सुनील केदार, मल्लिकार्जुन रेड्डी, राजेश काशीवार व रामचंद्र अवसरे या विदर्भातील नऊ आमदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी सुनील केदार हे काँग्रेसचे तर, उर्वरित सर्व भाजपाचे आमदार आहेत.मतदार अ‍ॅड. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार किशोर गजभिये यांनी डॉ. मिलिंद माने, आॅल इंडिया फॉर्वर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी डॉ. देवराव होळी, शिवसेनेचे उमेदवार गजानन बुटके यांनी कीर्तीकुमार भांगडिया, शरीफ खा वझीर खा यांच्यासह सात मतदारांनी राजू तोडसाम, भाजपाचे उमेदवार सोनबा मुसळे यांनी सुनील केदार, शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी मल्लिकार्जुन रेड्डी, काँग्रेसचे उमेदवार सेवकभाऊ वाघाये यांनी राजेश काशीवार तर, रणजित चव्हाण यांनी रामचंद्र अवसरे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. या आमदारांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांची निवडणूक रद्द करून संबंधित मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांची विनंती आहे. न्यायालयाने संबंधित आमदार व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.निवडणूक याचिकेवर सुनावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून विशेष न्यायपीठाची स्थापना करण्यात येते. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती आर.के. देशपांडे, डॉ. मिलिंद माने व मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती सुनील शुक्रे, डॉ. देवराव होळी व राजू तोडसाम यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती झेड.ए. हक, कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर तर, रामचंद्र अवसरे व राजेश काशीवार यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांचे विशेष न्यायपीठ स्थापन करण्यात आले आहे.केदार यांच्यासाठी नवे न्यायपीठसुनील केदार यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांचे विशेष न्यायपीठ स्थापन करण्यात आले होते. परंतु, न्यायमूर्ती देशपांडे यांनी काही कारणास्तव ही याचिका ‘नॉट बिफोर मी’ केली. यामुळे याचिकेसाठी नवीन न्यायपीठ स्थापन होणार आहे.