शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या थेट निवडीला आव्हान

By admin | Updated: September 29, 2016 02:47 IST

नगराध्यक्षांच्या पदाला स्थैर्य लाभावे व राजकीय घोडेबाजार थांबावा, यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा, १९६५मध्ये सुधारणा

मुंबई : नगराध्यक्षांच्या पदाला स्थैर्य लाभावे व राजकीय घोडेबाजार थांबावा, यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा, १९६५मध्ये सुधारणा करून नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांना करण्याचा अधिकार दिला. यावर राज्य सरकारने १९ मे २०१६ रोजी अध्यादेश काढला. या अध्यादेशाला इचलकरंजीच्या काही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.राजकीय मर्जीनुसार काही महिन्यातच नगराध्यक्ष बदलण्यात येतात. याला आळा बसावा, नगराध्यक्षाला स्थैर्य मिळावे व राजकीय घोडेबाजार थांबावा, यासाठी राज्य सरकारने नगराध्यक्षांची थेट निवड करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या नव्या अध्यादेशामुळे नगरसेवकांनीच त्यांच्यातील एका नगरसेवकाला बहुमत देऊन नगराध्यक्ष निवडण्याची प्रथा मोडीत निघणार आहे. मतदारांनाच त्यांचा नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाला इचलकरंजीच्या विठ्ठल चोपडे व अन्य काही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ‘मतदाराने नगराध्यक्ष निवडण्याची तरतूद घटनेमध्ये नाही. त्यामुळे राज्य सरकारची हा अध्यादेश घटनाबाह्य आहे. सरकारने मनमानीपणे अधिकाराचा वापर केला आहे,’ असे याचिकेत म्हटले आहे, तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणारी याचिकाही इचलकरंजीच्या राजेंद्र पाटील व अन्य काही जणांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्याद्वारे उच्च न्यायालयात केली आहे.‘इचलकरंजीमध्ये गेल्या पाच वर्षांत आठ ते दहा नगराध्यक्ष बदलण्यात आले. त्यामुळे इचलकरंजीचा विकास झाला नाही. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. मतदारांनाच नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार मिळावा,’ असे याचिकेत म्हटले आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १ आॅक्टोबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी) सरकारचा निर्णय मनमानी‘मतदाराने नगराध्यक्ष निवडण्याची तरतूद घटनेमध्ये नाही. त्यामुळे राज्य सरकारची हा अध्यादेश घटनाबाह्य आहे. सरकारने मनमानीपणे अधिकाराचा वापर केला आहे,’ असे इचलकरंजीच्या नगरसेवकांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.