शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
4
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
5
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
6
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
7
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
8
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
9
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
11
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
12
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
13
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
14
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
15
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
16
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
17
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
18
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
19
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
20
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

नगराध्यक्षांच्या थेट निवडीला आव्हान

By admin | Updated: September 29, 2016 02:47 IST

नगराध्यक्षांच्या पदाला स्थैर्य लाभावे व राजकीय घोडेबाजार थांबावा, यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा, १९६५मध्ये सुधारणा

मुंबई : नगराध्यक्षांच्या पदाला स्थैर्य लाभावे व राजकीय घोडेबाजार थांबावा, यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा, १९६५मध्ये सुधारणा करून नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांना करण्याचा अधिकार दिला. यावर राज्य सरकारने १९ मे २०१६ रोजी अध्यादेश काढला. या अध्यादेशाला इचलकरंजीच्या काही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.राजकीय मर्जीनुसार काही महिन्यातच नगराध्यक्ष बदलण्यात येतात. याला आळा बसावा, नगराध्यक्षाला स्थैर्य मिळावे व राजकीय घोडेबाजार थांबावा, यासाठी राज्य सरकारने नगराध्यक्षांची थेट निवड करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या नव्या अध्यादेशामुळे नगरसेवकांनीच त्यांच्यातील एका नगरसेवकाला बहुमत देऊन नगराध्यक्ष निवडण्याची प्रथा मोडीत निघणार आहे. मतदारांनाच त्यांचा नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाला इचलकरंजीच्या विठ्ठल चोपडे व अन्य काही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ‘मतदाराने नगराध्यक्ष निवडण्याची तरतूद घटनेमध्ये नाही. त्यामुळे राज्य सरकारची हा अध्यादेश घटनाबाह्य आहे. सरकारने मनमानीपणे अधिकाराचा वापर केला आहे,’ असे याचिकेत म्हटले आहे, तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणारी याचिकाही इचलकरंजीच्या राजेंद्र पाटील व अन्य काही जणांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्याद्वारे उच्च न्यायालयात केली आहे.‘इचलकरंजीमध्ये गेल्या पाच वर्षांत आठ ते दहा नगराध्यक्ष बदलण्यात आले. त्यामुळे इचलकरंजीचा विकास झाला नाही. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. मतदारांनाच नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार मिळावा,’ असे याचिकेत म्हटले आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १ आॅक्टोबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी) सरकारचा निर्णय मनमानी‘मतदाराने नगराध्यक्ष निवडण्याची तरतूद घटनेमध्ये नाही. त्यामुळे राज्य सरकारची हा अध्यादेश घटनाबाह्य आहे. सरकारने मनमानीपणे अधिकाराचा वापर केला आहे,’ असे इचलकरंजीच्या नगरसेवकांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.