शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

युती सरकारपुढे वचनपूर्तीचे आव्हान

By admin | Updated: December 7, 2014 01:43 IST

शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतातील सरकार पूर्ण बहुमतात आणले असले, तरी सरकारमधील बहतेक मंत्री नवखे आहेत.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन : सत्ताधारी बाकांवर जबाबदारीचे ओङो
यदु जोशी - मुंबई 
शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतातील सरकार पूर्ण बहुमतात आणले असले, तरी सरकारमधील बहतेक मंत्री नवखे आहेत. अशा नव्या टीमच्या बळावर नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला पहिल्यांदाच सामोरे जाताना या सरकारला बरीच कसरत करावी लागेल. विरोधी बाकांवर असतानाची आक्रमकता आणि आता सत्ताधारी बनल्यानंतर निवडणुकीतील आश्वासानांची पूर्तता करताना त्यांच्या नाकीनऊ येऊ शकतात.
अधिवेशन काही तासांवर आले असले तरी विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार, याबाबतची अनिश्चितता कायम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी या पदावर दावा केल्यामुळे विरोधकांमध्येच उभी फूट आहे. त्यामुळे या युती सरकारला विरोधकांच्या हल्ल्यांचा नव्हे, तर स्वत:च्याच आश्वासनाच्या पूर्ततेची कसोटी आहे. 
आतार्पयत विविध मुद्दय़ांवर घेतलेली भूमिका आणि आता त्याची अंमलबजावणी यातील विसंगती ठळकपणो दिसली, तर विरोधकांकडून सोपा बॉल आला तरी सरकार हिट विकेट होऊ शकते. ‘आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’ असे होता कामा नये, याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे.  फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी स्वत:बद्दल अशाच अपेक्षा वाढवून ठेवलेल्या असल्याने त्यांच्या पूर्ततेचे दडपण सरकारवर असेल. अधिवेशनाच्या तोंडावर सेनेला सोबत घेऊन भाजपाने सरकारचे बूड मजबूत केले असले, तरी निवडणुकीच्या काळापासून शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांतील नेत्यांची रुंदावलेली मने अजून पुरती सांधलेली नाहीत. शिवाय काल शपथविधी झाल्याने एकाही नव्या मंत्र्यास आपल्या खात्याचा अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. अधिवेशनात एखाद्या अवघड प्रश्नावर नवखे मंत्री चीत होऊ शकतात. त्यामुळे या अधिवेशनात विरोधक व सत्ताधारी दोघांचेही कौशल्य पणाला लागणार आहे. 
 
च्नागपूर करारानुसार अधिवेशन 
एक महिना चालावे. अधिवेशन गुंडाळण्याचा प्रय} झाला तर आम्ही सरकारला पळू देणार नाही.
च्कापसाला क्विंटलमागे किमान सहा हजार रुपये भाव दिलाच पाहिजे.
च्सत्ता आली तर टोलमुक्ती करणार. राज्यातून एलबीटी हद्दपार करणार
च्दुष्काळग्रस्त शेतक:यांना किमान 25 हजार रुपयांचे थेट पॅकज द्या.
च्राज्यात सत्ता आली तर स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करणार
 
आता काय भूमिका आहे ?
च्नागपूर अधिवेशनासाठी अवघ्या दोन आठवडय़ांचे कामकाज ठरविले आहे. विरोधकांनी मागणी केली, तर आणखी एक आठवडा चालेल.
च्कापूस उत्पादक शेतकरी दुष्काळी खाईत असताना कापसाला क्विंटलमागे अवघे चार हजार रुपये मिळत आहेत.
 
च्सरसकट टोल बंद करता येणार नाहीत, मात्र पारदर्शकता आणू. देशात जीएसटी लागू होईर्पयत राज्यात एलबीटी राहाणारच़
च्मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्तांना शासकीय नियमानुसारच मदत. पॅकेजची घोषणा नाही. सेना सत्तेत सहभागी झाल्याने स्वतंत्र विदर्भाचा विषय गुंडाळणार!