शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

चैत्र वणवा संपेना...

By admin | Updated: April 12, 2017 04:23 IST

उष्णतेच्या लाटेने पुन्हा महाराष्ट्र होरपळत असून, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही बहुतांश शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढे होता. चैत्रात अवतरलेल्या या वैशाख वणव्याने जिवाची

पुणे : उष्णतेच्या लाटेने पुन्हा महाराष्ट्र होरपळत असून, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही बहुतांश शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढे होता. चैत्रात अवतरलेल्या या वैशाख वणव्याने जिवाची काहिली होत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.देशात सौराष्ट्राच्या किनारपट्टीचा भाग तसेच कच्छ परिसरात उष्णतेची लाट आली आहे़ तमिळनाडूचा काही भाग, आसाम, मेघालय, पश्चिम राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, तेलंगणा, रायलसीमा आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी कमाल तापमानात वाढ झाली आहे़ राज्यात सर्वांत जास्त विदर्भ प्रभावित झाला आहे. उपराजधानी नागपूरसह सर्व प्रमुख शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढेच आहे. सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी सन्नाटा असतो. विदर्भापाठोपाठ खान्देश, मराठवाडादेखील होरपळून निघाला आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ कधी नव्हे ते पश्चिम महाराष्ट्रातील पाराही चढला आहे. बागायती पट्ट्यातील सातारा, सांगलीत तापमानदेखील ४० अंशाच्या पुढे आहे प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :पुणे ३९़६, अहमदनगर ४१़६, जळगाव ४१़२, कोल्हापूर ३९़५़, महाबळेश्वर ३५़५, मालेगाव ४०़८, नाशिक ३९़९, सांगली ४१, सातारा ४०, सोलापूर ४१़९, मुंबई ३४, अलिबाग ३५़१, रत्नागिरी ३२़३, पणजी ३४़२, डहाणू ३३़५, उस्मानाबाद ४०़८, औरंगाबाद ३९़४, परभणी ४१़५, नांदेड ४१़५, अकोला ४१़५, अमरावती ४०़़२, बुलढाणा ३८़६, ब्रम्हपुरी ४१, चंद्रपूर ४२़६, गोंदिया ३९़५, नागपूर ४१, वाशिम ३८, वर्धा ४१़२, यवतमाळ ४०़ पुढील दोन दिवस तापमान वाढणार‘‘सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात उष्णतेचे लाट आली असून या वाळंवटी प्रदेशातून येणारे ४० अंश सेल्अिस तापमान असलेले उष्ण वारे महाराष्ट्रात येत आहेत़ त्यामुळे पुढील किमान दोन दिवस राज्यातील तापमान चढेच राहील. या वाऱ्यांची दिशा व त्या त्या ठिकाणचे भौगोलिक स्थान यानुसार तापमानात चढउतार होऊ शकतो. - डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ