शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

सीईटी ‘सक्ती’ने जागा रिक्त?

By admin | Updated: October 21, 2016 03:04 IST

राज्यातील बी.एड अभ्यासक्रमाच्या सुमारे ७४ टक्के आणि एम.एड अभ्यासक्रमाच्या ९० टक्के जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित अभ्यासक्रमांना

मुंबई : राज्यातील बी.एड अभ्यासक्रमाच्या सुमारे ७४ टक्के आणि एम.एड अभ्यासक्रमाच्या ९० टक्के जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी यंदा शासनातर्फे घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेची अट बंधनकारक होती. परिणामी, या सीईटीला मुकलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रवेशाला मुकावे लागल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे.याआधी शासन आणि संबंधित महाविद्यालयातील व्यवस्थापनातर्फे वेगवेगळी सीईटी घेण्यात येत होती. त्यामुळे शासनाच्या सीईटीला मुकलेल्या प्रशिक्षणार्थींना व्यवस्थापनाने घेतलेल्या सीईटीद्वारे प्रवेश मिळत होते. मात्र केंद्र शासनाने सक्ती केल्यानंतर यंदा केवळ राज्य शासनाने घेतलेल्या सीईटीच्या आधारावर प्रवेश देण्यात आले. परिणामी, सीईटीला मुकलेल्या प्रशिक्षणार्थींना अट शिथिल करून प्रवेश देण्याचे अधिकार राज्य शासनाच्या हाती आहेत, अशी माहिती शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिली.मोते म्हणाले की, यासंदर्भातील मागणी उच्च शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. राज्यातून यंदा सुमारे ९ हजार ७०० विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली होती. बी.एड व एम.एड अभ्यासक्रमासाठी सीईटी देणे बंधनकारक असले, तरी सीईटीच्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देण्यात आलेले नाहीत. सीईटी परीक्षेत शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे सीईटी निकष निरुपयोगी ठरत असून, रिक्त जागा भरण्यासाठी सीईटीची अट शिथिल करण्याची गरज आहे. आधीच राज्यात नोकऱ्या उपलब्ध नसल्याने बहुतेक विद्यार्थी बीएड आणि एमएड अभ्यासक्रमांकडे पाठ फिरवत आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने रिक्त राहिलेल्या जागांमुळे राज्यातील बीएड आणि एमडची महाविद्यालये ओसाड पडतील. त्याचा सर्वाधिक फटका विनाअनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना बसेल. कारण विद्यार्थ्यांशिवाय महाविद्यालय प्रशासनाला प्राध्यापकांचे वेतन देणे कठीण होईल.मुदतवाढ देऊनही केवळ १० टक्के जागा भरल्या१राज्यात बी.एड अभ्यासक्रमाची ५५० महाविद्यालये असून, त्यांत सुमारे ३७ हजार प्रशिक्षणार्थींना सामावून घेण्याची क्षमता आहे. तर एम.एड अभ्यासक्रमासाठी ४ हजार ६७५ जागांची क्षमता आहे.२या दोन्ही अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया १७ सप्टेंबरला सुरू झाली. ५ आॅक्टोबरपर्यंत पुरेसे विद्यार्थी मिळाले नसल्याने प्रशासनाने प्रवेशाला १४ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली.३तरीही बी.एडच्या केवळ २६ टक्के जागा भरल्या असून, उरलेल्या ७४ टक्के जागा रिक्त आहेत. तर एम.एड अभ्यासक्रमाच्या केवळ १० टक्के जागा भरल्या असून, ९० टक्के जागा अद्याप रिक्त आहेत.अट शिथिल करण्याचा अधिकार : प्रवेशाचे विनियमन तरतुदीनुसार सीईटी देण्याबाबतची तरतूद राज्य शासनाला वगळण्याचा अधिकार आहे. अशीच परिस्थिती याआधी गुजरात, हिमाचल प्रदेश, बिहार, गोवा व पंजाब या राज्यांत उद्भवली होती. मात्र संबंधित राज्य शासनांनी प्रवेश प्रक्रियेतील सीईटी परीक्षेची अट शिथिल करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. यासंदर्भात १० दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयानेही शासनाला दिले आहेत. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे निर्णय घेऊन प्राध्यापकांना दिलासा देण्याची मागणी मोते यांनी शासनाकडे केली आहे.