शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

सीईटी ‘सक्ती’ने जागा रिक्त?

By admin | Updated: October 21, 2016 03:04 IST

राज्यातील बी.एड अभ्यासक्रमाच्या सुमारे ७४ टक्के आणि एम.एड अभ्यासक्रमाच्या ९० टक्के जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित अभ्यासक्रमांना

मुंबई : राज्यातील बी.एड अभ्यासक्रमाच्या सुमारे ७४ टक्के आणि एम.एड अभ्यासक्रमाच्या ९० टक्के जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी यंदा शासनातर्फे घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेची अट बंधनकारक होती. परिणामी, या सीईटीला मुकलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रवेशाला मुकावे लागल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे.याआधी शासन आणि संबंधित महाविद्यालयातील व्यवस्थापनातर्फे वेगवेगळी सीईटी घेण्यात येत होती. त्यामुळे शासनाच्या सीईटीला मुकलेल्या प्रशिक्षणार्थींना व्यवस्थापनाने घेतलेल्या सीईटीद्वारे प्रवेश मिळत होते. मात्र केंद्र शासनाने सक्ती केल्यानंतर यंदा केवळ राज्य शासनाने घेतलेल्या सीईटीच्या आधारावर प्रवेश देण्यात आले. परिणामी, सीईटीला मुकलेल्या प्रशिक्षणार्थींना अट शिथिल करून प्रवेश देण्याचे अधिकार राज्य शासनाच्या हाती आहेत, अशी माहिती शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिली.मोते म्हणाले की, यासंदर्भातील मागणी उच्च शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. राज्यातून यंदा सुमारे ९ हजार ७०० विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली होती. बी.एड व एम.एड अभ्यासक्रमासाठी सीईटी देणे बंधनकारक असले, तरी सीईटीच्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देण्यात आलेले नाहीत. सीईटी परीक्षेत शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे सीईटी निकष निरुपयोगी ठरत असून, रिक्त जागा भरण्यासाठी सीईटीची अट शिथिल करण्याची गरज आहे. आधीच राज्यात नोकऱ्या उपलब्ध नसल्याने बहुतेक विद्यार्थी बीएड आणि एमएड अभ्यासक्रमांकडे पाठ फिरवत आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने रिक्त राहिलेल्या जागांमुळे राज्यातील बीएड आणि एमडची महाविद्यालये ओसाड पडतील. त्याचा सर्वाधिक फटका विनाअनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना बसेल. कारण विद्यार्थ्यांशिवाय महाविद्यालय प्रशासनाला प्राध्यापकांचे वेतन देणे कठीण होईल.मुदतवाढ देऊनही केवळ १० टक्के जागा भरल्या१राज्यात बी.एड अभ्यासक्रमाची ५५० महाविद्यालये असून, त्यांत सुमारे ३७ हजार प्रशिक्षणार्थींना सामावून घेण्याची क्षमता आहे. तर एम.एड अभ्यासक्रमासाठी ४ हजार ६७५ जागांची क्षमता आहे.२या दोन्ही अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया १७ सप्टेंबरला सुरू झाली. ५ आॅक्टोबरपर्यंत पुरेसे विद्यार्थी मिळाले नसल्याने प्रशासनाने प्रवेशाला १४ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली.३तरीही बी.एडच्या केवळ २६ टक्के जागा भरल्या असून, उरलेल्या ७४ टक्के जागा रिक्त आहेत. तर एम.एड अभ्यासक्रमाच्या केवळ १० टक्के जागा भरल्या असून, ९० टक्के जागा अद्याप रिक्त आहेत.अट शिथिल करण्याचा अधिकार : प्रवेशाचे विनियमन तरतुदीनुसार सीईटी देण्याबाबतची तरतूद राज्य शासनाला वगळण्याचा अधिकार आहे. अशीच परिस्थिती याआधी गुजरात, हिमाचल प्रदेश, बिहार, गोवा व पंजाब या राज्यांत उद्भवली होती. मात्र संबंधित राज्य शासनांनी प्रवेश प्रक्रियेतील सीईटी परीक्षेची अट शिथिल करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. यासंदर्भात १० दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयानेही शासनाला दिले आहेत. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे निर्णय घेऊन प्राध्यापकांना दिलासा देण्याची मागणी मोते यांनी शासनाकडे केली आहे.