शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)

By admin | Updated: January 29, 2017 00:31 IST

विद्यार्थी व पालकवर्गातील स्पर्धा परीक्षेविषयी सातत्याने वाढणारी जागृती, मार्गदर्शन आणि संदर्भसाहित्याची स्थानिक पातळीवरील उपलब्धता, स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याच्या

- प्रा. राजेंद्र चिंचोले

विद्यार्थी व पालकवर्गातील स्पर्धा परीक्षेविषयी सातत्याने वाढणारी जागृती, मार्गदर्शन आणि संदर्भसाहित्याची स्थानिक पातळीवरील उपलब्धता, स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याच्या चढता आलेख या पार्श्वभूमीवर UPSC हे करिअरचे एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरत आहे. पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षापासूनच सूत्रबद्ध, शिस्तबद्ध अभ्यास केल्यास यशस्वी होणे शक्य आहे. नियोजनपूर्वक, सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध अभ्यास ही, UPSC परीक्षेत यशाची गुरुकिल्ली ठरते. UPSC परीक्षेबाबत न्यूनगंड दूर करून, आपल्या सामर्थ्यासोबत मर्यादा ओळखल्या पाहिजेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना १ आॅक्टोबर १९२६ या दिवशी धोलपूर हाउस नवी दिल्ली येथे झाली. पूर्वी हा आयोग ‘लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखला जायचा. १९३५ च्या कायद्यानुसार लोकसेवा आयोग हा ‘फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन’ या नावाने ओळखत जाऊ लागला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या उभारणीसाठी उत्तम प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी भारत सरकारच्या अधिपत्याखाली, भारतीय संविधानाच्या कलम ३१५ अनुसार संपूर्ण देशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Comission) ची स्थापना करण्यात आली. घटनेच्या कलम ३२० अन्वये केंद्र शासनातला वेगवेगळ्या विभागातील गट-अ, गट-ब सेवांची निर्मिती करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व १० सदस्यांची समिती असून, त्यांची निवड राष्ट्रपतींकडून केली जाते. यातील काही सदस्य नागरी सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी, निवृत्त अधिकारी असतात. केंद्रीय लोकसेवा आयोग हा स्वायत्त आयोग आहे.देशाच्या विकासाच्या जडणघडणीत महत्त्वाचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचे असते. शासनाने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असते. यासाठी योग्य, सक्षम, बुद्धिमान, प्रामाणिक, निर्णयक्षम, गतिमान, कुशल प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उमेदवारांचे कृषी, उद्योग, वाणिज्य, बुद्धिमत्ता, आकलन तर्कसंगती, सामाजिक, सांस्कृतिक, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, भाषा, राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक, भौगोलिक, ज्ञान, चालू घडामोडींवरील ज्ञान, क्षमतार्धिष्ठीत, निर्णयक्षम, प्रशासकीय अधिकारी राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. भारतातील गतिमान प्रशासन हे जगातील गतिमान प्रशासनापैकी एक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी देशातील वेगवेगळ्या सेवांच्या भरतीसाठी ४२ केंद्रावरून परीक्षा घेते.