शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)

By admin | Updated: January 29, 2017 00:31 IST

विद्यार्थी व पालकवर्गातील स्पर्धा परीक्षेविषयी सातत्याने वाढणारी जागृती, मार्गदर्शन आणि संदर्भसाहित्याची स्थानिक पातळीवरील उपलब्धता, स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याच्या

- प्रा. राजेंद्र चिंचोले

विद्यार्थी व पालकवर्गातील स्पर्धा परीक्षेविषयी सातत्याने वाढणारी जागृती, मार्गदर्शन आणि संदर्भसाहित्याची स्थानिक पातळीवरील उपलब्धता, स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याच्या चढता आलेख या पार्श्वभूमीवर UPSC हे करिअरचे एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरत आहे. पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षापासूनच सूत्रबद्ध, शिस्तबद्ध अभ्यास केल्यास यशस्वी होणे शक्य आहे. नियोजनपूर्वक, सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध अभ्यास ही, UPSC परीक्षेत यशाची गुरुकिल्ली ठरते. UPSC परीक्षेबाबत न्यूनगंड दूर करून, आपल्या सामर्थ्यासोबत मर्यादा ओळखल्या पाहिजेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना १ आॅक्टोबर १९२६ या दिवशी धोलपूर हाउस नवी दिल्ली येथे झाली. पूर्वी हा आयोग ‘लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखला जायचा. १९३५ च्या कायद्यानुसार लोकसेवा आयोग हा ‘फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन’ या नावाने ओळखत जाऊ लागला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या उभारणीसाठी उत्तम प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी भारत सरकारच्या अधिपत्याखाली, भारतीय संविधानाच्या कलम ३१५ अनुसार संपूर्ण देशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Comission) ची स्थापना करण्यात आली. घटनेच्या कलम ३२० अन्वये केंद्र शासनातला वेगवेगळ्या विभागातील गट-अ, गट-ब सेवांची निर्मिती करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व १० सदस्यांची समिती असून, त्यांची निवड राष्ट्रपतींकडून केली जाते. यातील काही सदस्य नागरी सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी, निवृत्त अधिकारी असतात. केंद्रीय लोकसेवा आयोग हा स्वायत्त आयोग आहे.देशाच्या विकासाच्या जडणघडणीत महत्त्वाचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचे असते. शासनाने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असते. यासाठी योग्य, सक्षम, बुद्धिमान, प्रामाणिक, निर्णयक्षम, गतिमान, कुशल प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उमेदवारांचे कृषी, उद्योग, वाणिज्य, बुद्धिमत्ता, आकलन तर्कसंगती, सामाजिक, सांस्कृतिक, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, भाषा, राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक, भौगोलिक, ज्ञान, चालू घडामोडींवरील ज्ञान, क्षमतार्धिष्ठीत, निर्णयक्षम, प्रशासकीय अधिकारी राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. भारतातील गतिमान प्रशासन हे जगातील गतिमान प्रशासनापैकी एक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी देशातील वेगवेगळ्या सेवांच्या भरतीसाठी ४२ केंद्रावरून परीक्षा घेते.