शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

‘संथारा’प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा

By admin | Updated: August 14, 2015 01:08 IST

राजस्थान उच्च न्यायालयाने ‘संथारा व्रता’बाबत दिलेल्या निर्णयात केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी गुरुवारी सकल जैन समाजाच्या शिष्टमंडळाने

औरंगाबाद : राजस्थान उच्च न्यायालयाने ‘संथारा व्रता’बाबत दिलेल्या निर्णयात केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी गुरुवारी सकल जैन समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. गुरुवारी सकाळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांची भेट घेऊन पंतप्रधानांकडे करण्यात आलेल्या मागण्यांचे निवेदन सोपविले. दांगट यांना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाने सुमतीप्रकाशजी म.सा. व विशालमुनीजी म.सा. यांचे आशीर्वाद घेतले. निवेदनात म्हटले आहे की, राजस्थान उच्च न्यायालयाने सोमवार, दि.१० आॅगस्ट रोजी जैन समाजातील संथारा व्रतावर बंदी घालणारा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे जैन बांधवांच्या भावनांना धक्का पोहोचला आहे. संथारा ही जैन समाजातील अतिशय प्राचीन प्रथा असून, या प्रथेची तुलना सतीसारख्या अमानवीय व आत्महत्येसारख्या घृणास्पद कृत्याशी कोणत्याही स्थितीत अजिबात केली जाऊ शकत नाही याची प्रकर्षाने दखल घेणे आवश्यक आहे. निवेदनात संथरा व्रताच्या समर्थनार्थ दहा मुद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. अतिशय शांतीप्रिय व अहिंसेच्या तत्त्वाचे काटेकोर पालन करण्यात जैन समाज सर्वपरिचित आहे. घटनेने सर्वांनाच धार्मिक प्रथा, परंपरेचे पालन करण्याचा हक्क बहाल केला आहे. त्यामुळे जैन समाजाची संथारासह सर्वच व्रत पालन करण्याची परंपरा खंडित केली जाऊ नये. त्यासाठी या प्रकरणात भारत सरकारतर्फे हस्तक्षेप करून राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला भारत सरकार व राजस्थान सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन जैन समाजाच्या भावनांचा आदर करावा, अशी विनंती पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया, गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनाही पाठविण्यात आली आहे. यावेळी सकल जैन समाजाचे कार्याध्यक्ष व आमदार सुभाष झांबड, महासचिव महावीर पाटणी, कोषाध्यक्ष जी.एम. बोथरा, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष प्रकाश बाफना, कांतीकुमार जैन, राजाबाजार जैन पंचायतचे अध्यक्ष ललित पाटणी, झुंबरलाल पगारिया, रमण साहुजी, शांतीनाथ गोसावी, रवी मुगदिया, संजय संचेती, विलास साहुजी, अ‍ॅड. डी.बी. कासलीवाल, प्रशांत देसरडा, विकास जैन, मिठालाल कांकरिया, कांतीलाल मुथा, डॉ. नंदलाल बोथरा, प्रकाश मुगदिया, देवेंद्र काला, तनसुख झांबड, सुनील वायकोस, सुभाष देसरडा, कन्हैयालाल रुणवाल, संतोष पापडीवाल, श्रीकांत वायकोस गुरुजी, पारस छाजेड, विनोद लोहाडे, पंकज फुलपगर, नगीन संघवी यांच्यासह भारतीय बागरेचा, नगरसेविका राखी देसरडा, डॉ. कांचन देसरडा, डॉ. निर्मला मुथा, कविता अजमेरा, मंगल पारख, भावना सेठिया, करुणा सावजी, पुष्पा बाफना, कमलाबाई ओसवाल, छाया रायसोनी, अनिता जैन, मीना पापडीवाल, कमलाबाई संकलेचा, चंचलबाई चोपडा आदींची उपस्थिती होती.