शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

कर्नाळा अभयारण्यावर केंद्र सरकारचा बुलडोझर

By admin | Updated: August 22, 2015 00:47 IST

मुंबई - नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतूसह विमानतळासाठी केंद्र सरकारने पनवेल नजिकच्या कर्नाळा पक्षी अभयारण्याचे क्षेत्र कमी तब्बल चार

नारायण जाधव, ठाणेमुंबई - नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतूसह विमानतळासाठी केंद्र सरकारने पनवेल नजिकच्या कर्नाळा पक्षी अभयारण्याचे क्षेत्र कमी तब्बल चार चौरस किमीने कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी १७ जून २०१५ रोजी अधिसूचना चोरी चोरी चुपके चुपके हरकती व सूचना मागवल्या होत्या. मात्र या अधिसूचनेची कल्पना कुणालाही नसल्याने कितपत पर्यावरणवाद्यांच्या हरकती येतील, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे या अभयारण्यातील आणि १४७ पक्षी आणि ३७ दुर्मिळ स्थलांतरीत पक्षांसह औषधी वनस्पतींच्या अस्तित्वावर गदा येण्याची भीती आहे.केंद्र सरकारचा हा निर्णय अंमलात आल्यानंतर अभयारण्याचे उरण आणि पनवेल तालुक्यातील १८ गावांच्या क्षेत्रातील क्षेत्र अवघे ० ते आठ चौरस किलोमिटर राहणार असल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सध्या या अभयारण्याचे क्षेत्र सरसकट १२.१० चौरस किलोमिटर असून मुंबई नजिकचे ते एकमेव पक्षी अभयारण्य आहे. आधीच मुंबई -गोवा रस्त्याच्या दोन किमी रूंदीकरणात त्याचा गळा घोटला गेला आहे. आता तर त्याचे क्षेत्र ४० टक्के कमी केल्यास त्यास पक्षी अभयारण्य म्हणावे का? असा सवाल पक्षीप्रेमींकडून केला जात आहे. कारण नवी मुंबई विमानतळ आणि एसईझेडच्या विकासामुळे येथील पशू-पक्षांच्या अस्तित्वच धोक्यात येणार आहे. नव्या अधिसुचनेनुसार हे क्षेत्र काही ठिकाणी ० चौरस किलोमिटर राहणार असून जास्तीतजास्त ते ८ चौरस किलोमिटर राहणार आहे.याशिवाय या सागरी सेतूसाठी अरबी समुद्रातील चिर्ले नजिक सुमारे ४० हेक्टर तिवरांच्या जंगलाचे नष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे नवी मुंबई विमानतळासाठी २५० हेक्टर, जेएनपीटीच्या विस्तारासाठी १४.४६ हेक्टर नंतर सागरी सेतूसाठी ४० हेक्टर क्षेत्र गृहीत धरले तर तिवरांचा मोठया प्रमाणात बळी जाणार आहे. यामुळे सागरी प्राणीमात्रांवरही विपरित परिणाम होणार आहे. समुद्रातील किटक आणि मत्स्य उत्पादनासह पृथ्वीवरील पशूपक्षी आणि वनस्पतींचा बळी या विमानतळासह सागरी सेतूमुळे जाणार असल्याने याविरोधात पर्यावरणप्रेमी काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.कर्नाळ्याचे क्षेत्र कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारने १७ जून ते १७ आॅगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत. ही अधिसूचन डॉ. जी. व्ही. सुब्रमण्यम यांच्या सहीने काढण्यात आली होती.