शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चार पादचारी पूल बांधण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी

By admin | Updated: June 23, 2017 15:17 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : - पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर एकूण चार ठिकाणी पादचारी पूल बांधण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रस्ते,परिवहन,वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मडकी वस्ती,सोलापूर विद्यापीठ,लोंढे वस्ती जिल्हा परिषद शाळा आणि भिमानगर (उजनी ) आशा चार ठिकाणी पादचारी पूल होणार आहेत.सोलापूर - पुणे या रस्त्याच्याया चौपदरीकरणामुळे सोलापूरच्या विकासाला गती मिळाली आहे.पूर्वी सोलापुरातून पुण्याला आणि पुण्याहून सोलापूरला येण्यासाठी जवळपास सहा ते साडेसहा तासांचा वेळ लागत होता.मात्र चार पदरी रस्ते झाल्यामुळे हे अंतर केवळ साडेतीन ते चार तासांवर आले आहे.आयएलअँडएफएस या कंपनीमार्फत या महामागार्चे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांचा वेग वाढला ,परिणामी ब?्याच ठिकाणी नागरिक आणि विध्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे बनले होते.तसेच त्या ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघात होऊन वाहतुकीला अडथळाही निर्माण होत होता.यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनी पालकमंत्री देशमुख यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन पादचारी पूल करण्याची वेळोवेळी मागणी केली होती.दरम्यान पालकमंत्री देशमुख यांनी सदरच्या कामाचा प्रस्ताव तयार करून आणि त्याची वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता.केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन तातडीने पादचारी पूल करण्याची मागणीसुद्धा लावून धरली होती.त्यानुसार गडकरी यांनी नागरिक आणि विध्यार्थ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा म्हणून पादचारी पुलाला मंजुरी दिली.या निर्णयामुळे वरील चारही ठिकाणच्या नागरिक आणि विध्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.सुमारे अंदाजे साडेतीन कोटी रुपये खर्चून पुढील सहा महिन्यात या पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी स्वत: पालकमंत्री देशमुख संबंधित खात्याकडे पाठपुरावा करून लक्ष घालणार आहेत.------------------------------------------------------सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी मोठी सोय पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामागार्मुळे वाहनधारक तसेच प्रवाशांची मोठी सोया झाली आहे.अत्यंत कमी वेळेत पुण्याला पोहोचणे शक्य झाले आहे.असे असताना या मार्गावरील महत्वाच्या ठिकाणचे नागरिक आणि विध्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा म्हणून तसेच अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी अनेकांनी पादचारी पुलांची मागणी केली होती.त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून पूल मंजूर करून घेतले आहेत.येत्या सहा महिन्यात चारही पूल तातडीने होण्यासाठी आपण पाठपुरावा चालू ठेवणार आहोत.या पुलामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.