शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चार पादचारी पूल बांधण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी

By admin | Updated: June 23, 2017 15:17 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : - पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर एकूण चार ठिकाणी पादचारी पूल बांधण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रस्ते,परिवहन,वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मडकी वस्ती,सोलापूर विद्यापीठ,लोंढे वस्ती जिल्हा परिषद शाळा आणि भिमानगर (उजनी ) आशा चार ठिकाणी पादचारी पूल होणार आहेत.सोलापूर - पुणे या रस्त्याच्याया चौपदरीकरणामुळे सोलापूरच्या विकासाला गती मिळाली आहे.पूर्वी सोलापुरातून पुण्याला आणि पुण्याहून सोलापूरला येण्यासाठी जवळपास सहा ते साडेसहा तासांचा वेळ लागत होता.मात्र चार पदरी रस्ते झाल्यामुळे हे अंतर केवळ साडेतीन ते चार तासांवर आले आहे.आयएलअँडएफएस या कंपनीमार्फत या महामागार्चे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांचा वेग वाढला ,परिणामी ब?्याच ठिकाणी नागरिक आणि विध्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे बनले होते.तसेच त्या ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघात होऊन वाहतुकीला अडथळाही निर्माण होत होता.यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनी पालकमंत्री देशमुख यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन पादचारी पूल करण्याची वेळोवेळी मागणी केली होती.दरम्यान पालकमंत्री देशमुख यांनी सदरच्या कामाचा प्रस्ताव तयार करून आणि त्याची वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता.केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन तातडीने पादचारी पूल करण्याची मागणीसुद्धा लावून धरली होती.त्यानुसार गडकरी यांनी नागरिक आणि विध्यार्थ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा म्हणून पादचारी पुलाला मंजुरी दिली.या निर्णयामुळे वरील चारही ठिकाणच्या नागरिक आणि विध्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.सुमारे अंदाजे साडेतीन कोटी रुपये खर्चून पुढील सहा महिन्यात या पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी स्वत: पालकमंत्री देशमुख संबंधित खात्याकडे पाठपुरावा करून लक्ष घालणार आहेत.------------------------------------------------------सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी मोठी सोय पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामागार्मुळे वाहनधारक तसेच प्रवाशांची मोठी सोया झाली आहे.अत्यंत कमी वेळेत पुण्याला पोहोचणे शक्य झाले आहे.असे असताना या मार्गावरील महत्वाच्या ठिकाणचे नागरिक आणि विध्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा म्हणून तसेच अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी अनेकांनी पादचारी पुलांची मागणी केली होती.त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून पूल मंजूर करून घेतले आहेत.येत्या सहा महिन्यात चारही पूल तातडीने होण्यासाठी आपण पाठपुरावा चालू ठेवणार आहोत.या पुलामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.