शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

देशव्यापी संपासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांची व्यूहरचना

By admin | Updated: July 2, 2016 05:14 IST

सातव्या वेतन आयोगाविरोधात ११ जुलैपासून देशव्यापी संपाची घोषणा केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात तगडी व्यूहरचना आखली

चेतन ननावरे,

मुंबई- केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सातव्या वेतन आयोगाविरोधात ११ जुलैपासून देशव्यापी संपाची घोषणा केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात तगडी व्यूहरचना आखली आहे. या व्यूहरचनेमध्ये ७ जुलैपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याला वेतन आयोगातील त्रुटींबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी सर्वच केंद्रीय कार्यालयांत बैठका सुरू झाल्या असून, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची मदत घेतली जात आहे.कॉन्फेडरेशन आॅफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉइज अ‍ॅण्ड वर्कर्स संघटनेचे सहनिमंत्रक आर. पी. सिंग यांनी सांगितले की, सरकारविरोधात ११ जुलैच्या संपात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, म्हणून संघटनेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. भाभा अणू संशोधन केंद्र, आयकर, पोस्टल विभाग या खात्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या विभागांतील कर्मचाऱ्यांनी संपात सामील होण्यासाठी संघटनेने अधिक लक्ष दिलेले आहे. शिवाय सरकारवर अधिक दबाव निर्माण करण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीही संपात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. इन्कम टॅक्स एम्प्लॉइज फेडरेशनचे मुंबई अध्यक्ष अशोक साळुंखे म्हणाले की, दिल्लीसोबतच मुंबईतील केंद्रीय कर्मचाऱ्यांकडे सर्वांचे लक्ष असते. त्यामुळे या ठिकाणी संप यशस्वी करण्यासाठी अधिक दबाव आहे. म्हणूनच मुंबईतील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांनी निर्धार केला आहे. असा असेल संप११ जुलैच्या संपात सामील झाल्यावर कोणताही कर्मचारी संप मागे घेतल्याशिवाय कार्यालयात येणार नाही. जेणेकरून वर्ग १ आणि २ च्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोणतीही मदत होणार नाही. त्यामुळे ते संपात सामील नसूनही अप्रत्यक्षरीत्या काम बंद राहील. कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर संघटनेचा एसएमएस जात नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही.काही कर्मचारी शासकीय कार्यालयाशेजारीच असलेल्या कर्मचारी वसाहतीत राहतात. असे कर्मचारी वसाहतीमध्येच निदर्शने करून सरकारविरोधातील रोष व्यक्त करतील.>राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ‘लक्षवेध दिन’केंद्र सरकारप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य सरकारने सहा महिने वेळकाढूपणा करू नये, म्हणून महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने ११ जुलैला राज्यव्यापी ‘लक्षवेध दिन’ पाळण्याचे निश्चित केले आहे. या दिवशी सर्व खात्यांमधील अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठका सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहेत. सातव्या वेतन आयोगासह अधिकाऱ्यांच्या जिव्हाळ््यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महासंघाने ही नामी शक्कल लढवली आहे.महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी सांगितले की, राज्य शासनातील सुमारे २६ लाख कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत आहेत. शिवाय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतरही शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. लक्षवेध दिनानिमित्ताने आयोजित होणाऱ्या बैठकांमध्ये यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांपैकी एक निवडण्याचा पर्याय उपलब्ध करावा, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना २ वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करावी, सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे ६० करावे अशा विविध मागण्यांवरही यावेळी चर्चा केली जाईल. चर्चेअंती मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचेही कुलथे यांनी सांगितले.