शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई रेल्वे सुसाट

By admin | Updated: February 17, 2017 03:12 IST

यंदा सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेला भरीव मदत देण्यात आली. ही मदत देतानाही मुंबई उपनगरीय

मुंबई : यंदा सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेला भरीव मदत देण्यात आली. ही मदत देतानाही मुंबई उपनगरीय रेल्वे प्रथम क्रमांकावर असल्याचे समोर आले. अर्थसंकल्पात मुंबईसाठी तब्बल २९ हजार ८१२ कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले. अर्थसंकल्पात मुंबईनंतर जुन्या प्रकल्पांना निधी आणि नवीन प्रकल्पांना मंजुरीच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्राचा दुसरा तर विदर्भाचा तिसरा क्रमांक लागतो. तर उत्तर महाराष्ट्राचा शेवटचा क्रमांक लागला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश करण्यात आला आणि हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला. अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी हजारो कोटींचा निधी व रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले. मात्र मंजूर निधी व प्रकल्पांत बाजी मारली ती मुंबईने. मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी विरार-वसई-पनवेल नवीन उपनगरीय मार्ग, सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड फास्ट कॉरीडोर आणि वांद्रे ते विरार एलिव्हेटेड हे नवीन प्रकल्प मंजूर करतानाच एमयूटीपी २ आणि ३साठी निधी देण्यात आला. अर्थसंकल्पात जवळपास २९ हजार ८१२ कोटी रुपयांचे प्रकल्प व निधी मिळवून मुंबई रेल्वे महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर राहिली. पश्चिम महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात तब्बल ७ हजार १६९ कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प आणि सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी ५00 कोटी रुपये मिळाले आणि हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पश्चिम महाराष्ट्रात पुणे-लोणावळा तिसरा-चौथा मार्ग हा सर्वांत महागडा नवीन प्रकल्प असून, त्याची किंमत ४ हजार २५३ कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली. विदर्भासाठीही अर्थसंकल्पात २ हजार १७७ कोटी रुपये मंजूर करून विदर्भवासीयांना दिलासा देण्यात आला आहे. तर १ हजार १८२ कोटींचा निधी सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी मिळाला आहे. यामुळे अमरावती, वर्धा, नागपूरमधील रेल्वे प्रकल्पांना गती मिळेल. कोकणसाठी १ हजार १0 कोटी रुपये आणि उत्तर महाराष्ट्रासाठी ४५७ कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प व निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)पश्चिम रेल्वेलाही अर्थसंकल्पात स्थानपश्चिम रेल्वेलाही अर्थसंकल्पात चांगले स्थान मिळाले आहे. नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी २ हजार ३४१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबईतील प्रवासी सुविधांसाठी १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून यामध्ये अंधेरी, वांद्रे, खार रोड, मालाड स्थानकात नवीन पादचारी पूल बांधणे आणि पुलांची डागडुजी करणे आणि वैतरणा ते डहाणूदरम्यान आठ स्थानकांवरील प्लॅटफॉर्मचे छत बदलण्याच्या कामाचाही समावेश आहे. तसेच मुंबई सेंट्रलमध्ये पाच लिफ्ट, वांद्रे स्थानकातील ऐतिहासिक इमारतीच्या संरक्षण व दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपयेही मंजूर केले आहेत. मुंबई-दिल्ली प्रवास १२ तासांत१मुंबई ते दिल्ली प्रवास आणखी वेगवान करण्यासाठी या मार्गावरील धावणाऱ्या ट्रेनचा वेग वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या मार्गावर धावणाऱ्या ट्रेनचा वेग ताशी १८0पर्यंत वाढवून मुंबई ते दिल्ली प्रवास १२ तासांत पार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १0३ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. २सुमारे १0 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प बनवण्यात आला असून, यात सिग्नल, रूळ बदलणे इत्यादी कामे केली जातील. काही ठिकाणी संरक्षक भिंतही बांधण्यात येईल. ट्रेनचा वेग ताशी १६0 ते २00 किमी राहील. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर म्हणाले की, प्रथम राजधानी ट्रेनचा वेग वाढवण्याचा विचार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दिल्लीपर्यंत धावणाऱ्या अन्य ट्रेनचा वेगही वाढवला जाईल.