शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई रेल्वे सुसाट

By admin | Updated: February 17, 2017 03:12 IST

यंदा सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेला भरीव मदत देण्यात आली. ही मदत देतानाही मुंबई उपनगरीय

मुंबई : यंदा सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेला भरीव मदत देण्यात आली. ही मदत देतानाही मुंबई उपनगरीय रेल्वे प्रथम क्रमांकावर असल्याचे समोर आले. अर्थसंकल्पात मुंबईसाठी तब्बल २९ हजार ८१२ कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले. अर्थसंकल्पात मुंबईनंतर जुन्या प्रकल्पांना निधी आणि नवीन प्रकल्पांना मंजुरीच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्राचा दुसरा तर विदर्भाचा तिसरा क्रमांक लागतो. तर उत्तर महाराष्ट्राचा शेवटचा क्रमांक लागला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश करण्यात आला आणि हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला. अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी हजारो कोटींचा निधी व रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले. मात्र मंजूर निधी व प्रकल्पांत बाजी मारली ती मुंबईने. मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी विरार-वसई-पनवेल नवीन उपनगरीय मार्ग, सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड फास्ट कॉरीडोर आणि वांद्रे ते विरार एलिव्हेटेड हे नवीन प्रकल्प मंजूर करतानाच एमयूटीपी २ आणि ३साठी निधी देण्यात आला. अर्थसंकल्पात जवळपास २९ हजार ८१२ कोटी रुपयांचे प्रकल्प व निधी मिळवून मुंबई रेल्वे महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर राहिली. पश्चिम महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात तब्बल ७ हजार १६९ कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प आणि सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी ५00 कोटी रुपये मिळाले आणि हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पश्चिम महाराष्ट्रात पुणे-लोणावळा तिसरा-चौथा मार्ग हा सर्वांत महागडा नवीन प्रकल्प असून, त्याची किंमत ४ हजार २५३ कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली. विदर्भासाठीही अर्थसंकल्पात २ हजार १७७ कोटी रुपये मंजूर करून विदर्भवासीयांना दिलासा देण्यात आला आहे. तर १ हजार १८२ कोटींचा निधी सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी मिळाला आहे. यामुळे अमरावती, वर्धा, नागपूरमधील रेल्वे प्रकल्पांना गती मिळेल. कोकणसाठी १ हजार १0 कोटी रुपये आणि उत्तर महाराष्ट्रासाठी ४५७ कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प व निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)पश्चिम रेल्वेलाही अर्थसंकल्पात स्थानपश्चिम रेल्वेलाही अर्थसंकल्पात चांगले स्थान मिळाले आहे. नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी २ हजार ३४१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबईतील प्रवासी सुविधांसाठी १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून यामध्ये अंधेरी, वांद्रे, खार रोड, मालाड स्थानकात नवीन पादचारी पूल बांधणे आणि पुलांची डागडुजी करणे आणि वैतरणा ते डहाणूदरम्यान आठ स्थानकांवरील प्लॅटफॉर्मचे छत बदलण्याच्या कामाचाही समावेश आहे. तसेच मुंबई सेंट्रलमध्ये पाच लिफ्ट, वांद्रे स्थानकातील ऐतिहासिक इमारतीच्या संरक्षण व दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपयेही मंजूर केले आहेत. मुंबई-दिल्ली प्रवास १२ तासांत१मुंबई ते दिल्ली प्रवास आणखी वेगवान करण्यासाठी या मार्गावरील धावणाऱ्या ट्रेनचा वेग वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या मार्गावर धावणाऱ्या ट्रेनचा वेग ताशी १८0पर्यंत वाढवून मुंबई ते दिल्ली प्रवास १२ तासांत पार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १0३ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. २सुमारे १0 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प बनवण्यात आला असून, यात सिग्नल, रूळ बदलणे इत्यादी कामे केली जातील. काही ठिकाणी संरक्षक भिंतही बांधण्यात येईल. ट्रेनचा वेग ताशी १६0 ते २00 किमी राहील. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर म्हणाले की, प्रथम राजधानी ट्रेनचा वेग वाढवण्याचा विचार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दिल्लीपर्यंत धावणाऱ्या अन्य ट्रेनचा वेगही वाढवला जाईल.