शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

२0१२ मधील गारपीट व पूरग्रस्तांना केंद्राचा मदतीचा हात

By admin | Updated: August 21, 2014 00:16 IST

राज्यात जानेवारी ते डिसेंबर २0१२ या कालावधीत गारपीट व पूरपरिस्थितीमुळे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती आणि फळ पिकांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे.

खामगाव: राज्यात जानेवारी ते डिसेंबर २0१२ या कालावधीत गारपीट व पूरपरिस्थितीमुळे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती आणि फळ पिकांसाठी केंद्र शासनाच्या एसडीआरएफ,एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत तातडीने वितरीत झाल्यास सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना ती मोलाची ठरणार आहे.जानेवारी ते डिसेंबर २0१२ या कालावधीत झालेल्या गारपीट आणि पुरामुळे राज्यातील सुमारे २३ हजार ६0४.0६ हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांचे तसेच फळपिकाचे नुकसान झाले होते. यामध्ये ७४१.८४ हेक्टरवरील फळपिकांचा समावेश होता. त्यामुळे या नुकसानीपोटी केंद्र शासनाच्या एसडीआरएफ, एनडीआरएफच्या निकषानुसार मदत वाटप करण्यात येणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारकांना कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी ३ हजार रूपये, सिंचनखालील पिकांसाठी प्रति हेक्टरी ६ हजार रुपये याप्रमाणे १ हेक्टरच्या र्मयादेत केंद्र शासनाची मदत मिळणार आहे. मदतीची कमीत कमी रक्कम ५00 रुपये एवढी राहणार आहे. फळपिके वा बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टरी ८ हजार रुपये याप्रमाणे १ हेक्टरच्या र्मयादेत मिळणार असून, मदतीची कमीतकमी रक्कम १ हजार रुपये राहणार आहे. अन्य शेतकर्‍यांसाठी कोरडवाहू क्षेत्राखालील नुकसानापोटी १ हेक्टरच्या र्मयादेत प्रतिहेक्टरी ३ हजार रुपये, आश्‍वासित जलसिंचन क्षेत्राखालील नुकसानापोटी १ हेक्टरच्या र्मयादेत प्रति हेक्टरी ६ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानापोटी १ हेक्टरच्या र्मयादेत प्रति हेक्टरी ८ हजार रुपये याप्रमाणे मदत मिळणार आहे. मदत वाटप कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे.** कृषी विभागाला सूचनाही मदत संबंधित खातेदारांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. यातून बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये. निधी मिळाल्यानंतर विशेष मोहिम आखून मार्च २0१५ पूर्वी मदत वाटप करावी, असे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत.  ** नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणार्‍या शेतकर्‍यांना, व्यक्तींना केंद्र शासनाच्या एसडीआरएफ, एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार गारपीट, पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, आग, त्सुनामी, भूस्खलन, ढगफुटी, टोळधाड व अतिथंडी या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी मदत दिली जाते.** जानेवारी ते डिसेंबर दरम्यान गारपीट व पुरामुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे कृषी विभागामार्फ त करण्यात आला होता. त्यानंतर याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता; मात्र ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाच मदत द्यावी, असा निकष ठरल्याने अनेक जिल्ह्यातील शेतकरी या मदतीसाठी अपात्र ठरले आहेत.