शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

२0१२ मधील गारपीट व पूरग्रस्तांना केंद्राचा मदतीचा हात

By admin | Updated: August 21, 2014 00:16 IST

राज्यात जानेवारी ते डिसेंबर २0१२ या कालावधीत गारपीट व पूरपरिस्थितीमुळे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती आणि फळ पिकांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे.

खामगाव: राज्यात जानेवारी ते डिसेंबर २0१२ या कालावधीत गारपीट व पूरपरिस्थितीमुळे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती आणि फळ पिकांसाठी केंद्र शासनाच्या एसडीआरएफ,एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत तातडीने वितरीत झाल्यास सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना ती मोलाची ठरणार आहे.जानेवारी ते डिसेंबर २0१२ या कालावधीत झालेल्या गारपीट आणि पुरामुळे राज्यातील सुमारे २३ हजार ६0४.0६ हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांचे तसेच फळपिकाचे नुकसान झाले होते. यामध्ये ७४१.८४ हेक्टरवरील फळपिकांचा समावेश होता. त्यामुळे या नुकसानीपोटी केंद्र शासनाच्या एसडीआरएफ, एनडीआरएफच्या निकषानुसार मदत वाटप करण्यात येणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारकांना कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी ३ हजार रूपये, सिंचनखालील पिकांसाठी प्रति हेक्टरी ६ हजार रुपये याप्रमाणे १ हेक्टरच्या र्मयादेत केंद्र शासनाची मदत मिळणार आहे. मदतीची कमीत कमी रक्कम ५00 रुपये एवढी राहणार आहे. फळपिके वा बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टरी ८ हजार रुपये याप्रमाणे १ हेक्टरच्या र्मयादेत मिळणार असून, मदतीची कमीतकमी रक्कम १ हजार रुपये राहणार आहे. अन्य शेतकर्‍यांसाठी कोरडवाहू क्षेत्राखालील नुकसानापोटी १ हेक्टरच्या र्मयादेत प्रतिहेक्टरी ३ हजार रुपये, आश्‍वासित जलसिंचन क्षेत्राखालील नुकसानापोटी १ हेक्टरच्या र्मयादेत प्रति हेक्टरी ६ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानापोटी १ हेक्टरच्या र्मयादेत प्रति हेक्टरी ८ हजार रुपये याप्रमाणे मदत मिळणार आहे. मदत वाटप कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे.** कृषी विभागाला सूचनाही मदत संबंधित खातेदारांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. यातून बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये. निधी मिळाल्यानंतर विशेष मोहिम आखून मार्च २0१५ पूर्वी मदत वाटप करावी, असे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत.  ** नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणार्‍या शेतकर्‍यांना, व्यक्तींना केंद्र शासनाच्या एसडीआरएफ, एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार गारपीट, पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, आग, त्सुनामी, भूस्खलन, ढगफुटी, टोळधाड व अतिथंडी या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी मदत दिली जाते.** जानेवारी ते डिसेंबर दरम्यान गारपीट व पुरामुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे कृषी विभागामार्फ त करण्यात आला होता. त्यानंतर याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता; मात्र ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाच मदत द्यावी, असा निकष ठरल्याने अनेक जिल्ह्यातील शेतकरी या मदतीसाठी अपात्र ठरले आहेत.