शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

केंद्राच्या ‘शाळासिद्धी’ला राज्यात अत्यल्प प्रतिसाद

By admin | Updated: February 22, 2017 04:26 IST

देशातील प्रत्येक शाळा प्रगत करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘शाळासिद्धी’ उपक्रम सुरू केला आहे

अविनाश साबापुरे / यवतमाळदेशातील प्रत्येक शाळा प्रगत करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘शाळासिद्धी’ उपक्रम सुरू केला आहे. दर्जेदार शिक्षण देत असल्याबाबतचे ‘शाळासिद्धी’ हे सरकारी मानांकन मिळविणे आता प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे. मात्र, यासाठी सध्या सुरू असलेल्या स्वयंमूल्यमापनाच्या प्रक्रियेला महाराष्ट्रातील ८० टक्के शाळांनी दांडी मारली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली.मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या ‘न्यूपा’ संस्थेतर्फे देशभरातील शालेय प्रशासनाचा अभ्यास आणि सुधारणा केली जाते. या संस्थेच्या निरीक्षणातच आता प्रत्येक शाळेला ‘शाळासिद्धी’ प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘न्यूपा’च्या पोर्टलवर सर्वप्रथम शाळांनी नोंदणी करणे, स्वयंमूल्यमापन करणे आवश्यक आहे. त्यानंतर, या शाळांचे बाह्यमूल्यमापन करून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यात महाराष्ट्रातील १ लाख ९९२ शाळांनी नोंदणी केली. मात्र, आता स्वयंमूल्यमापन सुरू झालेले असताना यातील ८० टक्के शाळांनी माघार घेतली आहे. स्वयंमूल्यमापनाची मुदत २८ फेब्रुवारी असताना तब्बल ८२ हजार ५४९ शाळांनी स्वयंमूल्यमापनाशी संबंधित माहिती अद्याप पोर्टलवर भरलेली नाही. केवळ १८ हजार ४४३ शाळांनीच ही माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या दबावामुळे इच्छा नसतानाही अनेक शाळांची नोंदणी करण्यात आल्याचे शिक्षक वर्तुळातून समजले. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात केवळ कागदोपत्री दिसण्याची शक्यता आहे.स्वयंमूल्यमापन टाळणाऱ्या शाळांची जिल्हानिहाय संख्याअहमदनगर ४६३८, अकोला १५०४, अमरावती २५२३, औरंगाबाद ३१९९, भंडारा ११२०, बीड ३४३२, बुलडाणा १९८०, चंद्रपूर १७५८, धुळे १६३४, गडचिरोली २०६९, गोंदिया १४७६, हिंगोली १२३५, जळगाव २८२९, जालना १९५३, कोल्हापूर २८३२, लातूर १९७६, मुंबई ७५५, नागपूर ३८०४, नांदेड ३०००, नंदूरबार १७००, नाशिक ४७८७, उस्मानाबाद १४४१, पालघर २७४२, परभणी ४०२, पुणे ३१९७, रायगड ३६५०, रत्नागिरी २५४३, सांगली २१७७, सातारा २२८१, सिंधुदुर्ग १५५३, सोलापूर ३५८०, ठाणे ३२१५, वर्धा १३१०, वाशिम ११९९, यवतमाळ २९६५.