शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा केंद्राचा घाट

By admin | Updated: January 15, 2015 04:54 IST

लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता भाजपा सरकारने महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप

अहमदनगर : लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता भाजपा सरकारने महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केला आहे. राज्य सरकारने केंद्राला विरोध करण्याचे धाडस दाखावावे, अन्यथा संघर्षाला समोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.आघाडी सरकारच्या काळातील पाणी वाटपाच्या सामंजस्य करारात बदल करून त्याला मूर्तरूप देण्याचे पडद्याआडून प्रयत्न सुरू आहेत, असा दावा विखे यांनी केला. दमणगंगा व नारपार खोऱ्यातील प्रकल्पांबाबत केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बैठक झाली़ या बैठकीबाबत सरकारने कमालीची गुप्तता पाळली़ राज्यातील पाणी पश्चिमेकडे वळविण्याचा निर्णय केंद्र व राज्यातील मंत्री, सचिव आणि उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाल्याचे समजते. बैठकीचे इतिवृत्त जनतेसमोर खुले करावे, त्यावर हरकती मागवाव्यात़ दोन्ही राज्यांत पूर्वी एक सामंजस्य करार झाला होता़ तो अंतिम करताना राज्याची परवानगी घ्यावी, अशी अट होती़ मात्र केंद्र सरकारने विश्वासात न घेता कराराला मूर्तरूप देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप त्यांनी केला. विखे म्हणाले, मुंबई शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन उर्वरित पाणी गुजरात राज्यात वळविण्याचा सरकारचा डाव आहे़ केंद्राचा हा निर्णय अन्यायकारक असून, राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेतली आहे़ हा करार झाला, त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते़ तेच आता देशाचे पंतप्रधान आहेत़ त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले़ परंतु विरोधाला विरोध म्हणून नाही तर जनतेच्या हितासाठी विरोध करणार आहे, असे सांगून नारायण राणे यांचे ते वैयक्तिक मत आहे, त्यांचा गैरसमज दूर केला जाईल, असा टोलाही विखे यांनी लगावला़