शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा केंद्राचा घाट

By admin | Updated: January 15, 2015 04:54 IST

लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता भाजपा सरकारने महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप

अहमदनगर : लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता भाजपा सरकारने महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केला आहे. राज्य सरकारने केंद्राला विरोध करण्याचे धाडस दाखावावे, अन्यथा संघर्षाला समोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.आघाडी सरकारच्या काळातील पाणी वाटपाच्या सामंजस्य करारात बदल करून त्याला मूर्तरूप देण्याचे पडद्याआडून प्रयत्न सुरू आहेत, असा दावा विखे यांनी केला. दमणगंगा व नारपार खोऱ्यातील प्रकल्पांबाबत केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बैठक झाली़ या बैठकीबाबत सरकारने कमालीची गुप्तता पाळली़ राज्यातील पाणी पश्चिमेकडे वळविण्याचा निर्णय केंद्र व राज्यातील मंत्री, सचिव आणि उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाल्याचे समजते. बैठकीचे इतिवृत्त जनतेसमोर खुले करावे, त्यावर हरकती मागवाव्यात़ दोन्ही राज्यांत पूर्वी एक सामंजस्य करार झाला होता़ तो अंतिम करताना राज्याची परवानगी घ्यावी, अशी अट होती़ मात्र केंद्र सरकारने विश्वासात न घेता कराराला मूर्तरूप देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप त्यांनी केला. विखे म्हणाले, मुंबई शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन उर्वरित पाणी गुजरात राज्यात वळविण्याचा सरकारचा डाव आहे़ केंद्राचा हा निर्णय अन्यायकारक असून, राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेतली आहे़ हा करार झाला, त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते़ तेच आता देशाचे पंतप्रधान आहेत़ त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले़ परंतु विरोधाला विरोध म्हणून नाही तर जनतेच्या हितासाठी विरोध करणार आहे, असे सांगून नारायण राणे यांचे ते वैयक्तिक मत आहे, त्यांचा गैरसमज दूर केला जाईल, असा टोलाही विखे यांनी लगावला़