शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा केंद्राचा घाट

By admin | Updated: January 15, 2015 04:54 IST

लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता भाजपा सरकारने महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप

अहमदनगर : लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता भाजपा सरकारने महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केला आहे. राज्य सरकारने केंद्राला विरोध करण्याचे धाडस दाखावावे, अन्यथा संघर्षाला समोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.आघाडी सरकारच्या काळातील पाणी वाटपाच्या सामंजस्य करारात बदल करून त्याला मूर्तरूप देण्याचे पडद्याआडून प्रयत्न सुरू आहेत, असा दावा विखे यांनी केला. दमणगंगा व नारपार खोऱ्यातील प्रकल्पांबाबत केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बैठक झाली़ या बैठकीबाबत सरकारने कमालीची गुप्तता पाळली़ राज्यातील पाणी पश्चिमेकडे वळविण्याचा निर्णय केंद्र व राज्यातील मंत्री, सचिव आणि उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाल्याचे समजते. बैठकीचे इतिवृत्त जनतेसमोर खुले करावे, त्यावर हरकती मागवाव्यात़ दोन्ही राज्यांत पूर्वी एक सामंजस्य करार झाला होता़ तो अंतिम करताना राज्याची परवानगी घ्यावी, अशी अट होती़ मात्र केंद्र सरकारने विश्वासात न घेता कराराला मूर्तरूप देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप त्यांनी केला. विखे म्हणाले, मुंबई शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन उर्वरित पाणी गुजरात राज्यात वळविण्याचा सरकारचा डाव आहे़ केंद्राचा हा निर्णय अन्यायकारक असून, राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेतली आहे़ हा करार झाला, त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते़ तेच आता देशाचे पंतप्रधान आहेत़ त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले़ परंतु विरोधाला विरोध म्हणून नाही तर जनतेच्या हितासाठी विरोध करणार आहे, असे सांगून नारायण राणे यांचे ते वैयक्तिक मत आहे, त्यांचा गैरसमज दूर केला जाईल, असा टोलाही विखे यांनी लगावला़