शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

हातमागासाठी केंद्राची धडपड

By admin | Updated: February 17, 2016 03:18 IST

राज्यात वेगाने वाढणाऱ्या औद्योगीकरणामुळे हातमाग उद्योगाला फटका बसला आहे. देशात २४ लाखांहून अधिक हातमाग विणकर असताना राज्यात त्यांची संख्या केवळ ५ हजार आहे

गौरीशंकर घाळे, मुंबईराज्यात वेगाने वाढणाऱ्या औद्योगीकरणामुळे हातमाग उद्योगाला फटका बसला आहे. देशात २४ लाखांहून अधिक हातमाग विणकर असताना राज्यात त्यांची संख्या केवळ ५ हजार आहे. त्यामुळे राज्यातील हातमाग टिकाविण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत असून पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणासाठी योजना आखण्यात आल्याची माहिती हातमाग विकास विभागाचे सल्लागार बिजन पॉल यांनी दिली.वांदे्र-कुर्ला संकुलातील ‘मेक इन इंडिया सेंटर’मध्ये हातमाग उद्योगातील वस्तूंचे विशेष दालन उभारण्यात आले आहे. देशाच्या विविध भागातील विणकर आणि कलाकारांनी बनविलेल्या वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील पैठणीचाही त्यात समावेश आहे. हातमागासाठी केंद्र सरकारने देशभरात गटस्तरावरील नोंदणी, प्रशिक्षण आणि उत्पादनासाठी दोन कोटींचा निधी जाहीर केला असून त्यासाठी एक हजार क्लस्टर तयार करण्यात आल्याची माहिती पॉल यांनी दिली. मेक इन इंडियाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत विणकाम, हातमागाची माहिती आणि महत्त्व पोहचविण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कमी खर्चात एकसारखे डिझाइन असणारे कापड मोठ्या प्रमाणावर तयार करता येते. मात्र, हातमागावर एखादे कापड विणण्यासाठी अधिक कालावधी व श्रमांची आवश्यकता असते. त्यामुळे हातमागाच्या पर्यावरण पूरक आणि नैसर्गिक कापडासाठी अधिक किंमत मोजावी लागते. ग्राहकांना दरातील ही तफावत समजावून सांगण्याचे मोठे आव्हान विभागासमोर आहे. त्याच वेळी श्रीमंत ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढविण्याचे प्रयत्नही आवश्यक असल्याचे पॉल यांनी सांगितले.