शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

केंद्राच्या पाणी एक्स्प्रेसची तूर्तास गरज नाही - उत्तर प्रदेश सरकार

By admin | Updated: May 5, 2016 15:34 IST

बुंदेलखंडमध्ये ट्रेनने पाणी पाठवू नका असे उत्तर प्रदेश सरकारने केंद्र सरकारला कळवले आहे. राज्यामधली पाण्याची अवस्था मराठवाड्याएवढी भीषण नसल्याचे

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 5 - बुंदेलखंडमध्ये ट्रेनने पाणी पाठवू नका असे उत्तर प्रदेश सरकारने केंद्र सरकारला कळवले आहे. राज्यामधली पाण्याची अवस्था मराठवाड्याएवढी भीषण नसल्याचे राज्य सरकारने केंद्राची ऑफर नाकारताना म्हटले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बुंदेलखंडमधल्या महोबा जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती असून रेल्वे मंत्रालयाने ट्रेनने पाणी पाठवण्याचा प्रस्ताव दिला होता. 
उत्तर प्रदेशचे महसूल विभागाचे मुख्य सचिव सुरेश चंद्रा यांनी रेल्वे प्रशासनाकडून तसा प्रस्ताव आल्याचे मान्य केले. मात्र, सध्याची उत्तर प्रदेशातली स्थिती मराठवाड्यासारखी भीषण नसल्यामुळे आत्ता तरी अशा जलएक्स्प्रेसची गरज नसल्याचे चंद्रा यांनी कळवले आहे. तसेच, जर तशीच गरज भासली तर आम्ही मागणी करू त्यावेळी पाणी द्या असेही चंद्रा यांनी रेल्वे मंत्रालयाला कळवले आहे.
बुंदेलखंडमध्ये पाण्याची समस्या आहे, परंतु आम्ही पुरेशा उपाययोजना करत असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे. दुष्काळी भागातल्या पंचायतींमध्ये वॉटर टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देत असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याखेरीज, या भागातले हँडपंपही व्यवस्थित काम करत आहेत, आणि आवश्यक त्या हँडपंप्सची दुरूस्तीही करण्यात येत आहे असा दावाही युपी सरकारने केला आहे.