शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

मुंबईतल्या कोस्टल रोडला केंद्राची मंजुरी

By admin | Updated: May 11, 2017 19:10 IST

मुंबईतल्या कोस्टल रोडला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - मुंबईतल्या कोस्टल रोडला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं अंतिम मंजुरी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. नरिमन पाइंट ते कांदिवलीच्या समुद्रालगत हा कोस्टल रोड होणार आहे. कोस्टल रोड झाल्यास पश्चिम उपनगरांतील वाहतुकीची कोंडी फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

अनेक वाद व विविध ना हरकत प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत बराच काळ रखडलेल्या सागरी मार्गातील शेवटचा अडथळाही दूर झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीनेही सहमती दर्शविल्यामुळे मरीन ड्राइव्ह ते कांदिवली या सागरी मार्गाचे मुंबईचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. सर्व महत्वाच्या परवानगी मिळाल्यामुळे मरीन ड्राइव्ह ते वांद्रेपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामाला पावसाळ्यानंतर सुरुवातही होणार आहे.

नरिमन पॉर्इंट ते कांदिवलीपर्यंत २९.२२ कि़लोमीटर सागरी मार्ग म्हणजेच कोस्टल रोड बांधण्याचा प्रस्ताव सहा वर्षांपूर्वी पुढे आला. मात्र विविध प्रकारच्या मंजुरी व मच्छिमार, पर्यावरणप्रेमींचा विरोध यामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. अखेर काही महत्वपूर्ण बदल केल्यानंतर या प्रकल्पाला सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीनेही अखेर हिरवा कंदील दाखविला आहे.

परवानगीमुळे आॅक्टोबरपासून कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु या कामासाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक करण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी व या जमिनीची मालकी असलेल्या राज्य सरकारकडून मंजुरी अशा दोन तांत्रिक ना हरकत प्रमाणपत्रांचीही आवश्यकता आहे. दरम्यान, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीनंतर महापालिका पहिल्या टप्प्यातील कामासाठी निविदा प्रक्रिया सुरु करत आहे. पहिल्या टप्प्यात मरीन ड्राइव्ह आणि वांद्रे वरळी सागरी सेतूच्या टोकापर्यंत दहा किलोमीटर रस्ता तयार करणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामावर चर्चा सुरु आहे.

आठ पदरी असलेल्या या मार्गावर चार अंतर्गत मार्गही असतील. त्यामुळे छोट्या अंतराचा प्रवास करणाऱ्या मोटार सायकलस्वारांना या मार्गाने प्रवास करण्याचे प्रोत्साहन मिळेल. परिणामी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटू शकेल.

चार वर्षांमध्ये सागरी मार्ग तयार होणे अपेक्षित आहे. त्यानंतर किमान ८० किलोमीटर प्रती तास वाहनाची गती असल्यास सागरी मार्गाचा प्रवास अर्ध्या तासात होईल.

महाराष्ट्र राज्य सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पर्यावरण मंजुरी घेण्यात बऱ्याच अडचणी आल्या. या प्रकल्पात खारफुटीची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्याने या प्रस्तावाला विरोध होत होता. मात्र काही अटींवर अखेर ही परवानगी मिळाली. प्रकल्पाच्या एकूण किंमतीच्या दोन टक्के रक्कम सागरी क्षेत्राच्या संवर्धनावर खर्च करावी लागणार आहे.