शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

मुंबईतल्या कोस्टल रोडला केंद्राची मंजुरी

By admin | Updated: May 11, 2017 19:10 IST

मुंबईतल्या कोस्टल रोडला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - मुंबईतल्या कोस्टल रोडला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं अंतिम मंजुरी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. नरिमन पाइंट ते कांदिवलीच्या समुद्रालगत हा कोस्टल रोड होणार आहे. कोस्टल रोड झाल्यास पश्चिम उपनगरांतील वाहतुकीची कोंडी फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

अनेक वाद व विविध ना हरकत प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत बराच काळ रखडलेल्या सागरी मार्गातील शेवटचा अडथळाही दूर झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीनेही सहमती दर्शविल्यामुळे मरीन ड्राइव्ह ते कांदिवली या सागरी मार्गाचे मुंबईचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. सर्व महत्वाच्या परवानगी मिळाल्यामुळे मरीन ड्राइव्ह ते वांद्रेपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामाला पावसाळ्यानंतर सुरुवातही होणार आहे.

नरिमन पॉर्इंट ते कांदिवलीपर्यंत २९.२२ कि़लोमीटर सागरी मार्ग म्हणजेच कोस्टल रोड बांधण्याचा प्रस्ताव सहा वर्षांपूर्वी पुढे आला. मात्र विविध प्रकारच्या मंजुरी व मच्छिमार, पर्यावरणप्रेमींचा विरोध यामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. अखेर काही महत्वपूर्ण बदल केल्यानंतर या प्रकल्पाला सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीनेही अखेर हिरवा कंदील दाखविला आहे.

परवानगीमुळे आॅक्टोबरपासून कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु या कामासाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक करण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी व या जमिनीची मालकी असलेल्या राज्य सरकारकडून मंजुरी अशा दोन तांत्रिक ना हरकत प्रमाणपत्रांचीही आवश्यकता आहे. दरम्यान, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीनंतर महापालिका पहिल्या टप्प्यातील कामासाठी निविदा प्रक्रिया सुरु करत आहे. पहिल्या टप्प्यात मरीन ड्राइव्ह आणि वांद्रे वरळी सागरी सेतूच्या टोकापर्यंत दहा किलोमीटर रस्ता तयार करणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामावर चर्चा सुरु आहे.

आठ पदरी असलेल्या या मार्गावर चार अंतर्गत मार्गही असतील. त्यामुळे छोट्या अंतराचा प्रवास करणाऱ्या मोटार सायकलस्वारांना या मार्गाने प्रवास करण्याचे प्रोत्साहन मिळेल. परिणामी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटू शकेल.

चार वर्षांमध्ये सागरी मार्ग तयार होणे अपेक्षित आहे. त्यानंतर किमान ८० किलोमीटर प्रती तास वाहनाची गती असल्यास सागरी मार्गाचा प्रवास अर्ध्या तासात होईल.

महाराष्ट्र राज्य सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पर्यावरण मंजुरी घेण्यात बऱ्याच अडचणी आल्या. या प्रकल्पात खारफुटीची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्याने या प्रस्तावाला विरोध होत होता. मात्र काही अटींवर अखेर ही परवानगी मिळाली. प्रकल्पाच्या एकूण किंमतीच्या दोन टक्के रक्कम सागरी क्षेत्राच्या संवर्धनावर खर्च करावी लागणार आहे.