शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
2
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
5
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
6
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
7
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
8
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
9
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
10
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
11
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
12
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
13
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
14
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
15
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
16
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
17
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
18
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
19
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
20
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

‘देशातील बाराही बंदरांच्या खासगीकरणाचा केंद्राचा घाट’

By admin | Updated: February 12, 2017 01:55 IST

देशात असलेल्या १२ बंदरांचे खासगीकरण करून त्यांच्या मालकीच्या जमिनी बिल्डर्स, बड्या भांडवलदारांच्या घशात घालून त्या जागी हॉटेल्स, रिसॉर्ट बनविण्याचा घाट केंद्र सरकारने

उरण : देशात असलेल्या १२ बंदरांचे खासगीकरण करून त्यांच्या मालकीच्या जमिनी बिल्डर्स, बड्या भांडवलदारांच्या घशात घालून त्या जागी हॉटेल्स, रिसॉर्ट बनविण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्यासाठी नव्याने मेजर पोर्ट अ‍ॅथोरिटी कायदा अंमलात आणण्याची तयारी सुरू केली. यामुळे बंदर कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असल्याने केंद्राच्या या कायद्याला फेडरेशनने विरोध दर्शविला आहेच. मात्र, वेळ पडल्यास विरोधासाठी संघर्ष करण्याचा निर्धार करून देशभरातील बंदरात चक्का जाम करण्याचा कडक इशारा आॅल इंडिया पोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष केरसी पारेख यांनी जेएनपीटी कामगार मेळाव्यातून दिला. आॅल इंडिया पोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशनशी संलग्न असलेल्या जेएनपीटी कामगार एकता संघटनेच्या वतीने शुक्रवारी जेएनपीटी कामगारांच्या परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जेएनपीटीतील भरत म्हात्रे प्रवेशद्वाराजवळील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात जेएनपीटी कामगारांचे प्रश्न आणि फेडरेशनची भूमिका या विषयावर ऊहापोह करण्यात आला. याप्रसंगी आॅल इंडिया पोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष केरसी पारेख, सेक्रेटरी आर.एम. मूर्ती, कल्पनाताई देसाई, एस.आर. यादव, जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष तथा जेएनपीटीचे माजी कामगार विश्वस्त दिनेश पाटील, अ‍ॅड. विजय पाटील आदी मान्यवर आणि एकता कामगार संघटनेचे पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आॅल इंडिया पोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशनच्या सेक्रेटरीपदी दिनेश पाटील यांच्या निवडीची घोषणा करून त्यांचा सत्कारही या वेळी करण्यात आला. जेएनपीटी कामगारांंनी दिनेश पाटील यांना आणि त्यांच्या संघटनेला जेएनपीटी कामगारांनी बळ द्यावे, भरघोस पाठिंबा द्यावा जेणेकरून फेडरेशनला आणखी ताकद मिळेल. त्यासाठी दिनेश पाटील यांच्या एकता कामगार संघटनेला पहिल्या क्रमांकावर नेऊन येऊ घातलेल्या कामगार ट्रस्टीपदाच्या निवडणुकीत दोन्ही कामगार ट्रस्टी एकता संघटनेचेच निवडून आणा, असे आवाहन केले. त्याचा फायदा कामगारांनाच होईल, असा विश्वासही पारेख यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. दिवंगत कामगार नेते एस.आर. कुलकर्णी यांच्या कार्यप्रणालीच्या आधारावर आणि फेडरेशनच्या पाठिंब्यावर जेएनपीटी कामगारांवरील कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा देत संघर्षास सज्ज असल्याचेही पाटील यांनी मेळाव्यात ठणकावून सांगितले. (प्रतिनिधी)मेजर पोर्ट अ‍ॅथोरिटी कायदा आणण्याची तयारी सुरू केली. १९०८ सालातील कायद्यात फेरबदल करून केंद्रातील भाजपाच्या सरकारने हा कायदा २०१५मध्ये अंमलात आणण्याचा घाट घातला. या कायद्यामुळे नॉनमेजर पोर्टमधील लाखो गोदी आणि बंदर कामगारांच्या सुरक्षिततेवरच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना वेळेवर वेतन मिळणार नाही. सुविधांपासूनही वंचित राहण्याची वेळ बंदर कामगारांवर येणार आहे. कामगारांना समान काम, समान वेतन मिळावे, अशी मागणी याआधीच फेडरेशनने लावून धरली आहे.