शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

विद्यापीठाची पाच वर्षांत अभ्यासक्रमांची शंभरी

By admin | Updated: April 13, 2015 05:43 IST

शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण सहज उपलब्ध व्हावे, यासाठी मुंबई विद्यापीठ सर्वोपरी प्रयत्न करीत असते.

मुंबई : शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण सहज उपलब्ध व्हावे, यासाठी मुंबई विद्यापीठ सर्वोपरी प्रयत्न करीत असते. विद्यापीठावर पडणारा ताण दिवसेंदिवस वाढत असताना विद्यापीठाने व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाची कास धरत गेल्या ५ वर्षांत १0१ अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे विद्यापीठात आजमितीला ३८६ अभ्यासक्रमांचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.मुंबई विद्यापीठाचा आवाका प्रचंड मोठा आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर ते ग्रामीण, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असते. परंतु विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या ७४0च्या घरात पोहोचल्याने विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण वाढत आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय सहज उपलब्ध व्हावी, यासाठी विद्यापीठाने ५ वर्षांत किती नवीन तुकड्या आणि अभ्यासक्रमांना मंजुरी दिली याबाबतचा प्रश्न सिनेट सदस्य डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये विद्यापीठाने गेल्या ५ वर्षांत ३१८ नवीन तुकड्या आणि १0१ नवीन अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले आहे.विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये, संस्था आणि विद्यापीठ विभागात एकूण ६ लक्ष ६० हजार ४३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण पडत असून, यावर उपाययोजना करण्यासाठी विद्यापीठाने प्रशासकीय कामाचे संगणकीकरण, एक्झाम रिफॉर्म, उपकेंद्रांची निर्मिती केली आहे. विद्यापीठाच्या उपकेंद्रात एकात्मक आणि व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे.