शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

‘सेन्सॉरशिप’ लादली जातेय

By admin | Updated: August 8, 2016 01:06 IST

हे खायचे नाही, तसा पोशाख घालायचा नाही, अशा पद्धतीने माणसाचे व्यक्तित्व ठरवून त्याची बाहुली करणार असाल तर त्याला काही अर्थ राहात नाही.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. ८ : हे खायचे नाही, तसा पोशाख घालायचा नाही, अशा पद्धतीने माणसाचे व्यक्तित्व ठरवून त्याची बाहुली करणार असाल तर त्याला काही अर्थ राहात नाही. एक ‘व्यक्ती’ म्हणून त्याचा विचार झाला पाहिजे. जर स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्याला मान्यता दिली जात नसेल आणि त्याला नाकारले जात असेल तर ते समाजाच्या दृष्टीने हानीकारक आहे, असे सांगत ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी ‘सेन्सॉरशिप’ लादली जात असल्याचे सांगितले.

पुणे नगर वाचन मंदिराच्या वतीने रत्नाकर मतकरी यांना प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते रविवारी ‘इंदिरा भालचंद्र पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. माधव सोमण उपस्थित होते. ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी मुलाखतीच्या माध्यमातून मतकरी त्यांच्याशी संवाद साधला.

पूर्वीच्या आणि आत्ताच्या सेन्सॉरशिपमध्ये फरक आहे. प्रत्येक नाटकाला होणारा विरोध हा वेगळा आहे. त्याचे मतप्रवाह तपासले गेले पाहिजेत. पण सध्या अप्रत्यक्षपणे सेन्सॉरशिप लादली जात आहे, असे सांगून राजकारण, समाजकारण आणि प्रेक्षकांच्या अभिरूचीच्या खालावलेल्या दर्जावर टीका करताना मतकरी म्हणाले, ‘‘राजकारण, समाजकारणाचा दर्जा खालावत चालला आहे, मग नाटकही त्याला अपवाद कसे राहणार? शिक्षणाचाही दर्जा खालावत आहे. पूर्वी शिक्षणपद्धतीमध्ये पाठ्यपुस्तकाच्या पलीकडची दृष्टी देण्याचा प्रयत्न केला जायचा. मात्र, असे शिक्षकच आता दिसत नाहीत. अशाच शिक्षकांच्या हातून पिढी गेली असल्याने त्यांच्याकडून अभिरूचीची अपेक्षा कशी करायची? तरीही खानदानी प्रेक्षक अजूनही आहे ज्यांना अजूनही वैचारिक नाटक हवे आहे.