शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

सेंन्सरद्वारे वारीतील गर्दीचे होणार आकलन

By admin | Updated: June 28, 2016 21:13 IST

पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी, दर्शनासाठी येणारे हजारो भाविक यामुळे पालखी स्थळाच्या ठिकाणी एकाचवेळी किती गर्दी आहे, याची काहीही माहिती पोलिसांना मिळत नाही़ सीसीटीव्हीवरुन

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २८ -  पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी, दर्शनासाठी येणारे हजारो भाविक यामुळे पालखी स्थळाच्या ठिकाणी एकाचवेळी किती गर्दी आहे, याची काहीही माहिती पोलिसांना मिळत नाही़ सीसीटीव्हीवरुन काही अंतरापर्यंतचे दृश्य दिसू शकते़. पण, त्याच्या आजूबाजूला नेमके किती लोक आहेत़ दर्शन घेण्यासाठी येणारे आणि दर्शन घेऊन परत जाणारे त्यांची एकत्रित माहिती उपलब्ध होऊ शकत नाही़. पालखी मुक्काम व त्याच्या परिसरात एकाचवेळी किती लोक आहेत, त्यात मिनिटागणीक किती वाढ होते किंवा घट होते, याची माहिती यंदा पोलिसांना मिळणार आहे तिही सेंन्सरच्या सहाय्याने़ या प्रयोगाविषयी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, दीपक साकोरे यांनी माहिती दिली़ पुणे पोलीस आणि ब्ल्युरेडिएंझ यांच्या वतीने नाना पेठ, रामोशी गेट, पालखी विठोबा चौक, निवडुंगा विठोबा मंदिर, पुलगेट या पाच ठिकाणी सेंन्सर बसविण्यात आले आहे़. पुण्यात पालखी चौक आणि निवडुंगा विठोबा मंदिर येथे पालख्यांचा मुक्काम असतो़. विश्रांतीच्या दिवशी पालख्याच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात़ गर्दी असते, असेच सांगितले जाते़. पण, त्यांची नेमकी संख्या किती असते़ याविषयी आजवर कोणतीही नोंद ठेवण्यात आलेली नाही़ ऐनवेळी गर्दी वाढली. तर त्याची तातडीने माहिती मिळून कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी उपाय योजना कशी करता येईल, या विचाराने रियल टाईम क्राऊड मेजरमेंट ही पद्धत वापरण्याचा प्रयोग यंदा प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहे़.

 याबाबत ब्ल्यु रानदाईजचे मकरंद हरदास यांनी सांगितले, की दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पाच ठिकाणी आपण सेंन्सर बसविण्यात आले आहे़ आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असतो़. या सेंन्सरच्या ४०० ते ५०० चौरस मीटर परिसरात कोणीही मोबाईल घेऊन आला की, सेंन्सर त्याची नोंद घेईल व त्या ठिकाणी त्यावेळेला किती लोकांची गर्दी आहे, याची माहिती मुख्य निरीक्षण केंद्राला तातडीने स्किनवर दिसेल़ त्या परिसरातून निघून गेल्यावर त्याची संख्या कमी होईल़ त्यामुळे एका ठिकाणी मर्यादेपेक्षा अधिक लोकांची गर्दी होत आहे, असे दिसत असल्यास पोलीस तातडीने उपाययोजना करुन तेथे काही होणार नाही, याची दक्षता घेऊ शकतील़ ज्यांच्याकडे मोबाईल नाही, यांची गणती यामध्ये होणार नाही़ या सेंन्सरमुळे पालखीच्या परिसरात एकावेळी लोकांची नेमकी संख्या किती आहे, याची माहिती पोलिसांना मिळू शकणार आहे़.