शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर बोर्ड - सरकारमध्ये पुन्हा संघर्ष

By admin | Updated: January 17, 2015 03:22 IST

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंह यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मेसेंजर आॅफ गॉड’ चित्रपटामुळे सेन्सॉर बोर्ड आणि केंद्र सरकार यांच्यामधील संघर्ष समोर आला आहे.

अनुज अलंकार, मुंबईडेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंह यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मेसेंजर आॅफ गॉड’ चित्रपटामुळे सेन्सॉर बोर्ड आणि केंद्र सरकार यांच्यामधील संघर्ष समोर आला आहे.सेन्सॉर बोर्डमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार आणि त्यातील अधिकाऱ्यांचा सरकारसोबत होणारा संघर्ष घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनुपम खेर बोर्डाचे अध्यक्ष असताना त्यांनी तत्कालीन यूपीए सरकारवर कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करीत राजीनामा दिला होता. काही चित्रपटांना मंजुरी मिळावी यासाठी सरकारकडूनच शिफारस करण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. यूपीए सरकार सत्तेवर आल्यानंतर अनुपम यांची गच्छंती अटळ होती. तरीही त्यांनी राजीनामा दिला नव्हता. नंतर मात्र सरकारी हस्तक्षेपाचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला. खेदाची गोष्ट ही की, चित्रपटसृष्टीशी निगडित असलेल्या लोकांनी जवळजवळ हाच आरोप करत बोर्डाचे पद सोडले आहे. ज्येष्ठ आणि लोकप्रिय दिग्दर्शक विजय आनंद हे इंडस्ट्रीतले अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणारे पहिले व्यक्ती होते. पदभार स्वीकारल्यानंतर आनंद यांनी बोर्डाच्या कामात अनेक चांगले बदल केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्मात्यांच्या समस्या कमी झाल्या. त्यांच्या कार्यकाळात सेन्सॉर बोर्डात मोकळेपणे काम करायला सुरुवात झाली होती. आज ती शैलीच झाली आहे. मात्र सरकार आणि विजय आनंद यांच्यात संघर्ष होण्याची वेळ शेखर कपूर यांच्या ‘बँडिट क्वीन’ या चित्रपटावेळी आली. या चित्रपटातील फुलनदेवीच्या निसर्गावस्थेतल्या दृश्याबाबत आनंद आणि सरकारमध्ये संघर्ष झाला. तो सीन रद्द करण्यास विजय आनंद यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांची अवहेलना केली गेल्याने आनंद यांनी राजीनामा दिला. त्यांच्यानंतर आशा पारेख यांनीही अनेक चित्रपटांबाबतीत त्यांचेही सरकारबरोबर संघर्षाचे प्रसंग आले. पण त्यांनी राजीनामा न देता कार्यकाळ संपेपर्यंत काम केले. पारेख यांच्यानंतर शर्मिला टागोर यांनी अनेक चित्रपटांवेळी सरकारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याचेही संकेत दिले. काही महिन्यांपूर्वी बोर्डाच्या अधिकाऱ्याने लाच घेतल्यामुळे त्याला झालेली अटकही खूप गाजली होती. तर बोर्डाची अधिकारी पंकजा ठाकूरवरही चित्रपटांमध्ये भेदभाव केल्याचा आरोप होता. त्यानंतर पंकजांना पदावरून हटवले.