अंथुण्रे : अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अंथुर्णेकरांनी जोरदार स्वागत केल़े बेलवाडी येथील गोलरिंगण पार पडल्यानंतर पालखी सोहळ्याने लासुर्णे, जंक्शन येथील विसावा घेतला. नंतर अंथुर्णे येथे पालखीचे मुक्कामासाठी सायंकाळी सहा वाजता आगमन झाल़े. अंथुर्णे गावच्या वेशीवर पुणो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणो यांनी श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळयाचे स्वागत केल़े
श्री छत्रपती हायस्कूल अंथुर्णे व सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्याथ्र्यानी लेझीम पथकाने पालखी रथापुढे लेझीम खेळुन व हरिनामाचा गजर करत उत्साहात पालखीचे स्वागत केल़े दत्तात्रय भरणो यांनी पालखीचे स्वागत केले. पायघडय़ावरून पालखी खांद्यावरून मुक्कामाच्या ठिकाणी नेली़ यावेळी अंथुर्णे गावचे संरपंच दत्तात्रय गायकवाड, माजी सरपंच राहुल साबळे, तानाजी शिंदे, एल. के. साबळे, तात्याराम बापु शिंदे, अनुप साबळे, प्रदिप साबळे, अंकुश साबळे, महात्मा गांधी तंटामुक्त समितिचे अध्यक्ष विशाल साबळे, ग्रामविकास अधिकारी पोटफाडे, ग्रामपंचायत सदस्य नाना पाटील, गुलाब म्हस्के, मारूती राऊत, श्री छत्रपती साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, भरणोवाडी गावचे सरपंच आंबादास भरणो, आब्बास भरणो, श्री छत्रपती हायस्कुल अंथुर्णे, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे व जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक, अंथुर्णे, भरणोवाडीचे ग्रामस्थ मोठय़ा संख्यने उपस्थित होते. तीव्र उन्हाच्या झळा जून महिना संपत आला तरी ही अद्याप पावसाचे आगमन न झाल्याने काहीसे निरूत्साहाचे सावट पालखी सोहळ्यावर प्रामुख्याने जाणवत होते. अंथुर्णे परिसरात विविध सामाजिक संस्थांनी वारीतील वारक:यांसाठी चहा, पाणी, अन्नदान, मोफत आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबविण्यात आले. अनुचित प्रकार घडु नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता. (वार्ताहर)
4विविध सोयी नियुक्त अंथुर्णे येथे 4क् एकर मैदानावर पालखी सोहळ्याची व्यवस्था अंथुर्णे ग्रामपंचायती मार्फत करण्यात आली. या परिसरातील तळयात पाटबंधारे विभागाकडुन मुबलक पाणीसाठा करण्यात आल्याने वारकयाना पाण्याची कमतरता भासली नाही़. पालखीच्या स्वागतासाठी अंथुर्णे व परिसरात पताका स्वागत कमानी लावुन सजावट करण्यात आली होती़.
4रांगोळी व गुढी उभारून ठिकठिकाणी सोहळयातील भक्तांचे स्वागत करण्यात येत होत़े पालखी तळ परिसरात कला आणि वाणिज्य महाविद्यालय कळंब (ता़ इंदापूर) येथील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ‘लेक वाचवा, व्यसन मुक्ती, भ्रष्टाचार, पर्यावरण आदी विषयांवर विविध कार्यक्रम करून जनजागृती केली़
4पालखी सोहळयाच्या आगमनाने परिसरात व भक्तीमय वातावरणाने भक्ताच्या व परिसरातील नागरिकांत आनंदाचे वातावरण होत़े. मुक्कामाच्या ठिकाणी मोठा मंडप उभारून नागरिकांना पालखीचे दर्शनाची सोय केल्याने सर्वाना दर्शनाचा लाभ मिळत होता.