शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

ईशान्य मुंबईवर सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: September 27, 2016 01:12 IST

सव्वा कोटीहून अधिक मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. उत्तर-पूर्व मुंबईत १८८० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत.

- जमीर काझी,  मुंबई

सव्वा कोटीहून अधिक मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. उत्तर-पूर्व मुंबईत १८८० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. तेथील सर्व महत्त्वाची ठिकाणे आणि प्रमुख मार्गांवर आता कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांची २४ तास नजर राहणार आहे. तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील कामाच्या पूर्ततेसाठी मात्र नवे वर्ष उजाडणार आहे. या टप्प्यात मध्य-पश्चिम मुंबईत १८८० कॅमेरे बसविले जाणार असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. मुंबई नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असते. २६/११च्या हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता. मात्र कॅमेऱ्यांचा दर्जा आणि किमतीबाबत पोलीस महासंचालक व गृह विभागामध्ये मतभेद असल्याने निविदा प्रक्रियेतच प्रस्ताव रखडला होता. अनेकवेळा निविदा काढूनही दर्जा आणि अटींमुळे एकही इच्छुक उत्पादक कंपनी पात्र ठरत नव्हती. त्यात तब्बल सात वर्षे गेली. ७ फेबु्रवारी २०१५ला राज्य सरकारने त्यासाठी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी सामंजस्य करार केला. सुरुवातीला मुंबई शहर व उपनगरांत ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर संख्या ४६९७पर्यंत कमी करण्यात आली. तीन टप्प्यांत हे काम पूर्ण केले जात असून, त्यासाठी सप्टेंबर २०१६ची मुदत निश्चित केली होती. मात्र ‘लार्सन’ला सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करता आले आहे. त्याचा अहवाल नुकताच मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह विभागाकडे पाठविला. पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईत ९३७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. आता उत्तर-पूर्व मुंबईत १८८० कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कामाच्या मोबदल्यात कंपनीला ११३ कोटी २५ लाख ७,२६१ रुपये वितरित करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. उर्वरित निधी प्रकल्प पूर्ण झाल्यावर- मुंबईतील प्रमुख ठिकाणी जागतिक दर्जाचे उच्च क्षमता असलेले १४९२ कॅमेरे, तर २० थर्मल आणि ४ हजार ८५० फिक्स बॉक्स कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने ६ जानेवारी २०१४मध्ये ६०० कोटींचा निधी निश्चित केला होता. त्यानंतर २ फेबु्रवारी २०१६ला झालेल्या बैठकीत ३४९ कोटींची वाढ करण्यात आली. या भागांवर ‘वॉच’ : पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील कॅमेरे कार्यान्वित केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात विक्रोळी, मुलुंड, भांडुप (प.), मानखुर्द, शिवाजीनगर व घाटकोपर पूर्व व पश्चिम या भागातील प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी १८८० कॅमेरे बसविलेले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात इतकेच कॅमेरे मध्य - पश्चिम भागात बसविले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.- कॅमेरे बसविणे व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त, गृह सचिव (विशेष), ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’चे प्रतिनिधी, प्रणाली एकात्मिक समितीचे सदस्य आणि गृह विभागाच्या पोल-३च्या उपसचिवांचा समावेश आहे.