शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्य मुंबईवर सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: September 27, 2016 01:12 IST

सव्वा कोटीहून अधिक मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. उत्तर-पूर्व मुंबईत १८८० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत.

- जमीर काझी,  मुंबई

सव्वा कोटीहून अधिक मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. उत्तर-पूर्व मुंबईत १८८० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. तेथील सर्व महत्त्वाची ठिकाणे आणि प्रमुख मार्गांवर आता कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांची २४ तास नजर राहणार आहे. तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील कामाच्या पूर्ततेसाठी मात्र नवे वर्ष उजाडणार आहे. या टप्प्यात मध्य-पश्चिम मुंबईत १८८० कॅमेरे बसविले जाणार असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. मुंबई नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असते. २६/११च्या हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता. मात्र कॅमेऱ्यांचा दर्जा आणि किमतीबाबत पोलीस महासंचालक व गृह विभागामध्ये मतभेद असल्याने निविदा प्रक्रियेतच प्रस्ताव रखडला होता. अनेकवेळा निविदा काढूनही दर्जा आणि अटींमुळे एकही इच्छुक उत्पादक कंपनी पात्र ठरत नव्हती. त्यात तब्बल सात वर्षे गेली. ७ फेबु्रवारी २०१५ला राज्य सरकारने त्यासाठी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी सामंजस्य करार केला. सुरुवातीला मुंबई शहर व उपनगरांत ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर संख्या ४६९७पर्यंत कमी करण्यात आली. तीन टप्प्यांत हे काम पूर्ण केले जात असून, त्यासाठी सप्टेंबर २०१६ची मुदत निश्चित केली होती. मात्र ‘लार्सन’ला सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करता आले आहे. त्याचा अहवाल नुकताच मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह विभागाकडे पाठविला. पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईत ९३७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. आता उत्तर-पूर्व मुंबईत १८८० कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कामाच्या मोबदल्यात कंपनीला ११३ कोटी २५ लाख ७,२६१ रुपये वितरित करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. उर्वरित निधी प्रकल्प पूर्ण झाल्यावर- मुंबईतील प्रमुख ठिकाणी जागतिक दर्जाचे उच्च क्षमता असलेले १४९२ कॅमेरे, तर २० थर्मल आणि ४ हजार ८५० फिक्स बॉक्स कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने ६ जानेवारी २०१४मध्ये ६०० कोटींचा निधी निश्चित केला होता. त्यानंतर २ फेबु्रवारी २०१६ला झालेल्या बैठकीत ३४९ कोटींची वाढ करण्यात आली. या भागांवर ‘वॉच’ : पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील कॅमेरे कार्यान्वित केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात विक्रोळी, मुलुंड, भांडुप (प.), मानखुर्द, शिवाजीनगर व घाटकोपर पूर्व व पश्चिम या भागातील प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी १८८० कॅमेरे बसविलेले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात इतकेच कॅमेरे मध्य - पश्चिम भागात बसविले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.- कॅमेरे बसविणे व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त, गृह सचिव (विशेष), ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’चे प्रतिनिधी, प्रणाली एकात्मिक समितीचे सदस्य आणि गृह विभागाच्या पोल-३च्या उपसचिवांचा समावेश आहे.