शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

सीसीआयकडे कापसाचा ओघ ओसरला

By admin | Updated: April 8, 2015 01:43 IST

दरवाढ न झाल्याने शेतक-यांचा ओढा व्यापा-यांकडे.

अकोला : कापूस पणन महासंघाच्या (सीसीआय) वतीने चुकीच्या पद्धतीने सरकीचे वितरण होत असल्याने कापूस दरवाढीला ह्यब्रेकह्ण लागला आहे. दरवाढ होत नसल्याने उत्पादकांनी सीसीआयकडे पाठ फिरवत व्यापार्‍यांना कापूस विकण्यास सुरुवात केली आहे. व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना क्विंटलमागे ५00 रुपयांपर्यंत अधिक दर दिला जात असल्याने शेतकर्‍यांचा ओढावा व्यापारी वर्गाकडे वाढला आहे. खरिपात कापूस उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांकडून सीसीआयला मोठय़ा प्रमाणावर कापूस विकला जातो. त्यामुळे हंगामात दररोज सीसीआयकडे तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस एकट्या अकोला जिल्ह्यातून जात होता. आता हे प्रमाण कमालीचे घटले आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेत राखून ठेवला होता; मात्र सीसीआयकडून कापसाला क्विंटलमागे ३९५0 रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला नाही. हंगाम संपत आला तरी दरवाढ करण्यात आली नाही. उलट व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना क्विंटलमागे ४६५0 रुपये दर मिळत आहे. तब्बल ५00 ते ७00 रुपये क्विंटलमागे अधिक मिळत असल्याने शेतकर्‍यांनी सीसीआयकडे पाठ फिरवून व्यापार्‍यांना कापूस विकणे सुरू केले आहे. *गाठीचे दर वाढले तरी कापसाची दरवाढ नाही सीसीआयकडून कापूस खरेदी केल्यानंतर प्रक्रिया करून रुईच्या गाठी केल्या जातात. या गाठीचे दर वाढले आहे. सरकीच्या तेलासोबतच ढेपीची मागणी वाढली असून, त्यामुळे त्यांचे दरही वाढले आहेत. असे असतानाही कापसाला सीसीआयकडून दरवाढ दिली जात नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. चुकीच्या पद्धतीने सरकी वितरणाचा फटका ४सीसीआयकडून आवश्यकता व क्षमतेपेक्षा अधिक सरकीचे वितरण तेल काढणार्‍या कंपन्यांना होत आहे. त्यामुळे या कंपन्या सीसीआयला सरकीचे दर वाढवून देण्यास तयार नाही. परिणामी सीसीआयला कापसाचे दर वाढविता आले नाहीत.