शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

सीसीआयकडे कापसाचा ओघ ओसरला

By admin | Updated: April 8, 2015 01:43 IST

दरवाढ न झाल्याने शेतक-यांचा ओढा व्यापा-यांकडे.

अकोला : कापूस पणन महासंघाच्या (सीसीआय) वतीने चुकीच्या पद्धतीने सरकीचे वितरण होत असल्याने कापूस दरवाढीला ह्यब्रेकह्ण लागला आहे. दरवाढ होत नसल्याने उत्पादकांनी सीसीआयकडे पाठ फिरवत व्यापार्‍यांना कापूस विकण्यास सुरुवात केली आहे. व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना क्विंटलमागे ५00 रुपयांपर्यंत अधिक दर दिला जात असल्याने शेतकर्‍यांचा ओढावा व्यापारी वर्गाकडे वाढला आहे. खरिपात कापूस उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांकडून सीसीआयला मोठय़ा प्रमाणावर कापूस विकला जातो. त्यामुळे हंगामात दररोज सीसीआयकडे तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस एकट्या अकोला जिल्ह्यातून जात होता. आता हे प्रमाण कमालीचे घटले आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेत राखून ठेवला होता; मात्र सीसीआयकडून कापसाला क्विंटलमागे ३९५0 रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला नाही. हंगाम संपत आला तरी दरवाढ करण्यात आली नाही. उलट व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना क्विंटलमागे ४६५0 रुपये दर मिळत आहे. तब्बल ५00 ते ७00 रुपये क्विंटलमागे अधिक मिळत असल्याने शेतकर्‍यांनी सीसीआयकडे पाठ फिरवून व्यापार्‍यांना कापूस विकणे सुरू केले आहे. *गाठीचे दर वाढले तरी कापसाची दरवाढ नाही सीसीआयकडून कापूस खरेदी केल्यानंतर प्रक्रिया करून रुईच्या गाठी केल्या जातात. या गाठीचे दर वाढले आहे. सरकीच्या तेलासोबतच ढेपीची मागणी वाढली असून, त्यामुळे त्यांचे दरही वाढले आहेत. असे असतानाही कापसाला सीसीआयकडून दरवाढ दिली जात नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. चुकीच्या पद्धतीने सरकी वितरणाचा फटका ४सीसीआयकडून आवश्यकता व क्षमतेपेक्षा अधिक सरकीचे वितरण तेल काढणार्‍या कंपन्यांना होत आहे. त्यामुळे या कंपन्या सीसीआयला सरकीचे दर वाढवून देण्यास तयार नाही. परिणामी सीसीआयला कापसाचे दर वाढविता आले नाहीत.