शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

‘सीबीएस’ पद्धतीच्या परीक्षा ‘पोस्टपोन’

By admin | Updated: November 12, 2014 00:54 IST

‘प्रभारी’ अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अजूनही भोंगळ कारभारच सुरू असल्याचे चित्र आहे. परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या

नागपूर विद्यापीठ : अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा विद्यार्थ्यांना फटकानागपूर : ‘प्रभारी’ अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अजूनही भोंगळ कारभारच सुरू असल्याचे चित्र आहे. परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे ‘सीबीएस’ (क्रेडीट बेस सिस्टीम)पद्धतीच्या सर्व परीक्षा ‘पोस्टपोन’ कराव्या लागल्या आहेत. अनेक ‘पेपर्स’चे ‘मॉडरेशन’च झाले नसल्याने परीक्षा विभागाची अडचण झाली आहे. १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा आता २६ नोव्हेंबरकडे सुरू होण्याचे अंदाज आहेत. विद्यापीठात ‘मॉडरेशन’चे संकट असल्याचे वृत्त ‘लोकमत’नेच सर्वात अगोदर दिले होते. विधानसभा निवडणुकांमुळे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना यंदा १० दिवस उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे उर्वरित परीक्षा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी गंभीरतेने प्रयत्न होणे आवश्यक होते. परंतु महाविद्यालयांवर अगोदरपासूनच वचक नसलेल्या परीक्षा विभागाचा कार्यभार ‘प्रभारी’ अधिकाऱ्यांकडे असल्याने प्राध्यापकांचे चांगलेच फावले. कधी निवडणुका, तर कधी दिवाळीची सुटी अशी निरनिराळी कारणे देत अनेक प्राध्यापक ‘मॉडरेशन’च्या कामात अनुपस्थित राहिले अन् त्याचा फटका परीक्षांना बसला. प्रश्नपत्रिकांचे ‘मॉडरेशन’च झाले नसून अ़नेक विषयांच्या तर प्रश्नपत्रिकादेखील तयार नाहीत. अशा स्थितीत केवळ ३ दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून ‘प्रिंटींग’ कसे होणार या विवंचनेत पडल्याने परीक्षा विभागाला ‘सीबीएस’ प्रणालीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)कोण आहे जबाबदार ?विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा १० आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या. परंतु विधानसभा निवडणुकांमुळे त्या १० दिवस समोर ढकलाव्या लागल्या. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परीक्षा विभागाची जबाबदारी डॉ.श्रीकांत कोमावार यांच्याकडे होती. या काळातच हिवाळी परीक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलणे आवश्यक होते. परंतु प्राध्यापकांवर वचकच नसल्याने ‘मॉडरेशन’चे काम वेळेत पूर्ण झाले नाही. परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकारदेखील घेतला नाही. कोमावार यांच्यानंतर प्रशांत मोहिते यांच्याकडे परीक्षा विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यांनी जबाबदारी स्वीकारताच त्यांच्यासमोर आव्हान होते ते हिवाळी परीक्षांना सुरुवात करण्याचे. परंतु इतर प्रशासकीय बाबीतील सावळागोंधळ सावरण्यातच त्यांचा वेळ गेला. त्यामुळे आता या स्थितीसाठी नेमके जबाबदार कोण हे शोधण्याची तसदी प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे घेतील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.विद्यार्थ्यांपर्यंत माहिती जाणार कधी?दरम्यान, या सर्व गोंधळात विद्यार्थ्यांचे मात्र नाहक हाल होत आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ झाल्याची अफवा आहे की नेमके काय अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. मोठमोठे दावे करणाऱ्या विद्यापीठाची ‘कम्युनिकेशन’ यंत्रणाच जणू कोलमडली आहे. त्यामुळेच अद्यापपर्यंत परीक्षा समोर ढकलण्यात आल्याची बाब संकेतस्थळावर टाकण्यात आलेली नाही. परीक्षा प्राध्यापकांच्या हलगर्जीपणामुळेच ‘पोस्टपोन’ झाल्या असल्याची माहिती परीक्षा विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भात प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.