शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘शारदा’ची सीबीआय चौकशी

By admin | Updated: May 9, 2014 23:08 IST

प. बंगाल, ओडिशा आणि आसाममधील कोट्यवधी रुपयांचा चीटफंड घोटाळ्याचा सीबीआयने तपास करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे.

नवी दिल्ली : प. बंगाल, ओडिशा आणि आसाममधील कोट्यवधी रुपयांचा चीटफंड घोटाळ्याचा सीबीआयने तपास करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे. प. बंगालमधील राजकीय वातावरण ढवळून काढणार्‍या शारदा चीटफंड कंपनीसह विविध कंपन्या या घोटाळ्यात गुंतल्या आहेत. या घोटाळ्याची आंतरराज्यीय व्याप्ती पाहता तपास राज्य प्रशासनाकडून सीबीआयकडे सोपविणेच चांगले राहील. आरोपी कंपन्यांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) तपासाची गती वाढवावी, असे न्या.टी.एस. ठाकूर यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले. सीबीआय तपासावर निगराणी ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याला मात्र त्यांनी वेळेचे कारण देत नकार दिला. राज्य प्रशासनाने या कामी सीबीआयला तपासाची सर्व विस्तृत माहिती देत सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. तातडीची उपाययोजना म्हणून देशभरातील चीटफंड व्यवसाय थांबविला जावा, तसेच गुंतवणूकदारांकडून पैसा गोळा करण्याची प्रक्रिया तडकाफडकी थांबवावी, अशी विनंती एका जनहित याचिकेत करण्यात आली होती. आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही. राज्य सरकारांनी सुरू केलेला तपास पक्षपाती आणि पूर्वग्रह दूषित असून सीबीआयकडूनच चौकशी केली जावी, अशी विनंतीही याचिकाकर्त्यांनी केली होती. प. बंगाल सरकारकडून स्वागत प. बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याच्या अवघ्या दोन दिवस आधी हा आदेश आला असला तरी आम्ही स्वागत करतो, असे प. बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी म्हटले. नंदीग्राम आणि नेताई हत्याकांडाच्या तपासात सीबीआयला आलेले अपयश पाहता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रारंभी सीबीआय चौकशीला विरोध केला होता. मात्र, विरोधकांनी चौफेर टीका केल्यानंतर त्यांनी भूमिका बदलली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)

शारदा घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीचे डाव्या पक्षांनी स्वागत केले आहे, त्याचवेळी या घोटाळ्यात गुंतलेल्यांच्या राजकीय संबंधांची, तसेच मनी लाँड्रिंगची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

चार राज्यांमध्ये चीटफंड घोटाळ्यात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारने सीबीआय चौकशीला नेहमीच विरोध केला होता.

मनी लाँड्रिंगसह राजकीय संबंधांचीही चौकशी करावी. शारदा समूहातील सर्व कंपन्यांची तसेच मालकांची संपूर्ण मालमत्ता गोठवून गुंतवणूकदारांना अंतरिम भरपाई द्यावी, असे माकपने एका निवेदनात स्पष्ट केले.

तृणमूल काँग्रेसचे लोकच या घोटाळ्यात गुंतले असल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठीच तृणमूल काँग्रेसच्या सरकारने सीबीआय चौकशी रोखून धरली होती, असा आरोप भाकपने एका निवेदनात केला.