शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जवखेडा हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा

By admin | Updated: December 11, 2014 00:49 IST

आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी आमचाच छळ चालवला आहे. खऱ्या गुन्हेगारांना सोडून उलट आता पोलिसांनी आमच्याच कुटुंबावरच संशय घ्यायला सुरु वात केली आहे.

आंबेडकरी समाज आणि धार्मिक अल्पसंख्यक समाज संघर्ष समिती नागपूर : आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी आमचाच छळ चालवला आहे. खऱ्या गुन्हेगारांना सोडून उलट आता पोलिसांनी आमच्याच कुटुंबावरच संशय घ्यायला सुरु वात केली आहे. पोराच्या खुनात पुतण्याला गोवण्यात आले आहे. पोलीस ‘लुचाड’ असतील पण माझा समाज नाही. तो माझ्या पाठीशी आहे, या हत्याकांडाची चौकशी सीबीआयकडून करा, अशी मागणी मृत संजय याचे वृद्ध आई-वडील साखराबाई, जगन्नाथ जाधव व त्यांच्या कुटुंबीयांनी केली. महाराष्ट्रभर सामाजिक असंतोषाला कारणीभूत ठरलेल्या जवखेड्यातील क्रूर तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषेधार्त आंबेडकरी समाज आणि धार्मिक अल्पसंख्यक समाज (बौद्ध, मुस्लीम, शीख, ख्रिश्नच) संघर्ष समितीच्यावतीने आज बुधवारी विधानभवनावर धडकलेल्या मोर्चात ते बोलत होते. घटनेची माहिती देताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. या मोर्चाचे नेतृत्व भिक्खु संघाने केले. यावेळी संघानुशासक भदंत सदानंद महास्थिवर, भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भदन्त सदानंद महास्थिवर, भदन्त विमलकीर्ती गुणसिरी यांच्यासह सरदार इक्बालसिंग सल्होत्रा, मौलाना क्वाद्री उपस्थित होते. श्याम गायकवाड म्हणाले, जवखेडा येथील संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री व मुलगा सुनील याची अमानुष हत्या करण्यात आली. या घटनेला एक महिना उलटून गेला. परंतु पोलिसांना आरोपींचा छडा लावण्यास अपयश आले आहे. यामुळे त्यांनी जाधव कुटुंबातीलच लोकांवर खाटे आरोप लावून त्यांना ताब्यात घेणे सुरू केले आहे. आंबेडकरी जनतेला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे, असेही ते म्हणाले. आंबेडकरी विचारवंत प्रदीप आगलावे म्हणाले, आम्ही संघटित नसल्याने असे भ्याड हल्ले होत आहेत. आतातरी संघिटत व्हा, जाधव कुटुंबीयाच्या पाठिशी राहा, असे आवाहनही त्यांनी केले. सल्होत्रा म्हणाले, अशा घटना नेहमीच दलित आणि अल्पसंख्यकांसोबतच होतात. यामुळे सर्वांनी एक होऊन लढा उभारणे आवश्यक आहे. भदन्त विमलकीर्ती गुणसिरी म्हणाले, संघाच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे. आता कोणत्याही समाजाच्या माणसावर अन्याय झाल्यास हा संघ त्याच्या पाठीशी राहील, असेही ते म्हणाले. भंते सुरई ससाई म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या मोर्चात यायला हवे होते. आंबेडकरी जनतेचा हा संताप त्यांनी अनुभवायला हवा होता. मी स्वत: त्यांना या प्रकरणात पोलीस कसे चुकतात आहेत, याची माहिती देणार आहे, असे म्हणत त्यांनी संघटित राहण्याचे आवाहन केले. यावेळी मौलाना क्वाद्री, डॉ. सुचित बागडे, योगेश वऱ्हाडे, प्रा. रणजित मेश्राम, तक्षशीला वाघधरे, संजय जीवने, किशोर गजभिये, अशोक सरस्वती यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. मोर्चाच्या आयोजनासाठी अमन कांबळे, नारायण बागडे, सुरेश तेलंग, घनश्याम फुसे, पी.एस.खोब्रागडे, राहुल मून आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार -राम शिंदेजवखेडा हत्याकांडाबाबत बुधवारी करण्यात आलेल्या आंदोलनातील शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यात सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करून दलित अन्याय-अत्याचाराच्या सर्व घटनांना त्वरित निकाली काढण्यात यावे, जाधव कुटुंब व त्यांचे संबंधित नातेवाईकांना संरक्षण द्यावे, मॅटने दिलेल्या पदोन्नतीमध्ये आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात शासनाच्यावतीने आव्हान देण्यात यावे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे, भगवद्गीता संदर्भातील मागणी मान्य करण्यात येऊ नये व दलित, बौद्ध, शीख, मुस्लीम आणि ख्रिश्चन या सर्व अल्पसंख्यक समाजांच्या हितांचे संरक्षण करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या. त्यावर राम शिंदे म्हणाले, हे प्रकरण गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांसमोर या मागण्या मांडून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.