शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

राजकीय जोखडातून सीबीआयची मुक्तता

By admin | Updated: May 7, 2014 04:41 IST

खटला दाखल करण्यासाठी सरकारकडून पूर्वसंमती घेण्याचे बंधन रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्रीय गुप्तचर विभागास (सीबीआय) राजकीय जोखडातून मुक्त केले.

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल : भ्रष्टाचार खटल्यासाठी संमतीची गरज नाही

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये चौकशी करण्यासाठी अथवा खटला दाखल करण्यासाठी सरकारकडून पूर्वसंमती घेण्याचे बंधन रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्रीय गुप्तचर विभागास (सीबीआय) राजकीय जोखडातून मुक्त केले. सीबीआयच्या तपासाच्या अधिकारावर असे बंधन घालणे केवळ घटनाबाह्यच नाही तर भ्रष्ट अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याच्या प्रवृत्तीस खतपाणी घालणारे आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. सीबीआय ही ‘दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’ या कायद्यान्वये स्थापन झालेली केंद्रीय तपासी यंत्रणा आहे. केंद्र सरकारच्या सेवेतील सहसचिव किंवा त्याहून वरच्या हुद्द्याच्या अधिकार्‍यांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी अथवा त्या आरोपांवरून खटला दाखल करण्यासाठी सरकारची पूर्वसंमती घेण्याचे बंधन या कायद्याच्या कलम ६(ए) अन्वये सीबीआयवर घालण्यात आले होते. केंद्रीय दक्षता आयोग कायद्याच्या २६(१) मध्येही अशीच तरतूद होती. सरन्यायाधीश न्या. राजेंद्र मल लोढा, न्या. ए. के. पटनायक, न्या. सुधांशू ज्योती मुखोपाध्याय, न्या. दीपक मिश्रा आणि न्या. फकीर मोहंमद इब्राहीम कलिफुल्ला यांच्या घटनापीठाने एकमताने निर्णय देऊन दोन्ही (पान २ वर) कायद्यांमधील या तरतुदी घटनाबाह्य ठरवून रद्द केल्या. सर्वांसाठी कायदा समान आहे आणि व्यक्ती कितीही मोठी असली तरी कायदा तिच्याहून श्रेष्ठ आहे या राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ ने प्रस्थापित केलेल्या संवैधानिक तत्वाची ही कलमे पायमल्ली करणारी आहेत, असे न्यायालयाने जाहीर केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी १९९७ मध्ये व ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ने २००४मध्ये दाखल केलेल्या दोन जनहित याचिकांवर न्यायालयाने हा निकाल दिला. या याचिकांमध्ये उपस्थित झालेले घटनात्मक मुद्दे द्विसदस्यीय खंडपीठाने २००५ मध्ये घटनापीठाकडे वर्ग करण्याची शिफारस केली होती. ‘सीबीआय हा धनी पढवेल तसे बोलणारा पिंजर्‍यातील पोपट आहे’, असे भाष्य न्यायालयाने अलीकडेच केले होते. त्याच न्यायालयाने या पिंजर्‍यातील पोपटाला जोखडातून मुक्त करण्यास नऊ वर्षे लावली, हे लक्षणीय आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) लंगडा युक्तिीवाद फेटाळला सरकारी धोरणे ठरविणे आणि ती राबविणे हे काम वरिष्ठ अधिकार्‍यांचे असते. त्रास देण्याच्या उद्देशाने केल्या जाणार्‍या खोटयानाट्या तक्रारींपासून या आधिकार्‍यांना संरक्षण दिले नाही तर ते भय-मुर्वत न ठेवता निर्णय घेणार नाहीत वा सस्लाही हातचा राखून देतील. असे होणे प्रशासनास मारक ठरेल, असा युक्तिवाद करून केंद्र सरकारने या बंधनाचे समर्थन केले होते. पण तो फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, १९९७ पूर्वी आणि त्यानंतर सप्टेंबर २००३ पर्यंत हे पूर्वसंमतीचे बंधन नव्हते. त्याकाळात सीबीआयकडून कोणाही अधिकार्‍याचा सीबीआयकडून मुद्दाम छळ केला गेल्याचे एकही उदाहरण सरकारने दिलेले नाही. एखादा अधिकारी केवळ विशिष्ठ पदावर आहे म्हणून भ्रष्टाचाराच्या कारवाईत त्याला कायद्याचा वेगळा मापदंड लावणे समानतेच्या मूलतत्त्वाचे उल्लंघन आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.