शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सेनेचा विजय ठरणार युतीतील भांडणाचे निमित्त

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला भाजपाची साथ लाभल्याने रवींद्र फाटक विजयी झाले.

अजित मांडके,

ठाणे- विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला भाजपाची साथ लाभल्याने रवींद्र फाटक विजयी झाले. मंत्रालयापासून जळगावपर्यंत एकमेकांची धुणी धुणाऱ्या या सत्ताधारी पक्षांनी ठाण्यात एकजुटीचे दर्शन घडवले असले तरी येत्या महापालिका निवडणुकीत जागावाटपाच्या चर्चेकरिता जेव्हा हे पक्ष एकत्र बसतील, तेव्हा विधानसभा निवडणूक निकालाच्या आधारे भाजपाने आणि विधान परिषद निकालाच्या बळावर शिवसेनेने जागांचे दावे-प्रतिदावे केले, तर ही एकजूट टिकेल किंवा कसे, याची चिंता युतीच्या धुरिणांना लागली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी भाजपाच्या मदतीने राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचा १५१ मतांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीत गेल्या २० वर्षांचे युतीमधील हे दोन पक्ष परस्परविरोधी लढल्याने स्थानिक निवडणुकीत भाजपाने विधानसभा निकालाच्या आधारे जागांची मागणी सुरू केली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये जागावाटपामुळे युती तुटली व परस्परांविरुद्ध शिवसेना-भाजपा लढले. शिवसेनेला सर्वाधिक ५३ जागा मिळाल्या. मात्र, भाजपाच्या नऊ नगरसेवकांची संख्या ४३ झाली. ठाणे पालिका निवडणुकीतही विधानसभा निकालाच्या आधारे भाजपा ४० जागांची मागणी करीत आहे. मागील वेळी त्यांना २० जागा सोडल्यावर केवळ ८ नगरसेवक विजयी झाले होते.विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या फाटक यांना पाठिंबा देताना पालिका निवडणुकीतील जागावाटपाची तडजोड झालेली नाही. त्यामुळे जेव्हा दोन्ही पक्ष त्या चर्चेला बसतील, तेव्हा फाटक यांच्या विजयात भाजपाचा सिंहाचा वाटा असल्याचा दावा केला जाईल, तर फाटक यांचा विजय शिवसेनेच्या व्यूहरचनेचा भाग असून ठाण्यावरील शिवसेनेची पकड मजबूत असल्याचा तो पुरावा असल्याचे शिवसेना सांगेल. त्यामुळे या निवडणुकीत दिसलेली एकजूट पालिका निवडणुकीपर्यंत टिकण्याची सुतराम शक्यता नसल्याचे युतीचे नेते खाजगीत कबूल करतात. एकनाथ खडसे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतल्यावर शिवसैनिकांनी जळगावमध्ये पेढे वाटून आनंद साजरा केला. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अलीकडेच मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराचे मूळ हे साहेब, मेहुणा व पीए यांच्यापर्यंत जाते, असे वक्तव्य करीत थेट शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून भाजपा-शिवसेना यांच्यात खडाखडी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील एकजुटीचे फेव्हिकॉल महापालिका निवडणुकीत निघून हे दोन पक्ष विलग होण्याची चिन्हे दाट आहेत.>राष्ट्रवादीची उतरती कळा कायमडावखरे यांच्या पराभवाचा फटका अगोदरच कमकुवत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद महापालिका निवडणुकीत घटवणार, अशी चिन्हे दिसत आहेत. ठाण्याच्या राजकारणात वसंत डावखरे आणि जितेंद्र आव्हाड यांचे गट आहेत. डावखरे यांचा पराभव झाल्याने आता त्यांच्या गटाचे महापालिका निवडणूक जागावाटपात किती वर्चस्व राहणार, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे डावखरेसमर्थक नगरसेवक व इच्छुक आव्हाडांच्या वळचणीला जाण्यापेक्षा शिवसेना अथवा भाजपाकडे जाण्याचा पर्याय स्वीकारू शकतात. समजा, काही डावखरेसमर्थकांनी आव्हाड यांचे नेतृत्व स्वीकारायचे ठरवले, तरी मुंब्रा परिसरात एमआयएमचा शिरकाव झाल्याने आव्हाड यांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान उभे राहिले आहे.शिवसेनेने मुस्लिमबहुल प्रभागात धनुष्यबाणाऐवजी अपक्ष चालण्याची भूमिका घेतली असल्याने त्याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची चिन्हे आहेत. विधान परिषद निवडणुकीत एमआयएमची मते शिवसेनेने आपल्याकडे वळवली असल्यास महापालिका निवडणुकीत शिवसेना आपल्या राजकीय लाभाकरिता एमआयएम चालवणार, हे उघड आहे. त्यामुळे आगामी काळात ठाण्यात राष्ट्रवादी वाढण्याऐवजी घटण्याची चिन्हे अधिक आहेत. डावखरे यांचा पराभव झाल्याने नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांचे वजन वाढणार असून तेदेखील ठाण्यात जोरदार शिरकाव करण्याची शक्यता आहे. त्यामुळे डावखरे यांचा पराभव राष्ट्रवादीतील कलह वाढवणारा आणि पक्षापुढील संकटे वाढवणारा ठरणार असल्याचे बोलले जाते.