शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जात प्रमाणपत्र पडताळणी आता जिल्हास्तरावर

By admin | Updated: June 11, 2014 01:18 IST

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी आता जिल्हास्तरावर केली जाणार आहे. ९ जून रोजी सामाजिक न्याय विभागाने

विभागीय समित्या बरखास्त : अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समितीराजेश निस्ताने - यवतमाळअनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी आता जिल्हास्तरावर केली जाणार आहे. ९ जून रोजी सामाजिक न्याय विभागाने या संबंधीचा आदेश जारी केला. उपरोक्त जात वैधता प्रमाणपत्रांच्या तपासणीसाठी यापूर्वी २२ नोव्हेंबर २०१३ च्या आदेशान्वये विभागीय समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. परंतु या समित्यांकडे मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब पुढे आली. जात वैधता प्रमाणपत्राअभावी अनेकांना शैक्षणिक प्रवेश, नोकरी, बढती याला मुकावे लागले. प्रत्येकच जिल्ह्यात किमान पाच ते दहा हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. यावर तोडगा म्हणून विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या बरखास्त (निरशित) करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याऐवजी आता जिल्हास्तरीय समित्यांमार्फत जात प्रमाणपत्र पडताळणी केली जाणार आहे.अपर जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष राहतील. त्यासाठी त्यांच्या पदाची श्रेणी वाढ करून ते निवड श्रेणीमध्ये रुपांतरित करण्यास मान्यता दिली गेली आहे. समाज कल्याण विभागाचे उपायुक्त या जिल्हा समितीचे सदस्य तर सहायक आयुक्त हे सदस्य सचिव राहणार आहे. विशेष असे उपरोक्त जिल्हास्तरीय समित्यांसाठी आवश्यक असणारा उपायुक्त, समाज कल्याण तथा संशोधन अधिकारी व अन्य कर्मचारी वर्ग नव्याने निर्माण केला जाणार आहे. त्यासंंबंधीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. राज्यात सध्या १५ जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत आहेत. या समित्यांवरील सर्व संबंधितांना त्या-त्या जिल्ह्यात त्यांचे मुख्यालये ठरवून वर्ग केले जाणार आहे. नागपूर विभागातील क्र. २ च्या समितीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मुख्यालय मात्र वर्धा हे राहणार असून वर्धा जिल्ह्यात या यंत्रणेला वर्ग केले जाणार आहे. दक्षता पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही त्यांचे सध्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हास्तरावरील समित्यांवर वर्ग केले जाणार आहे. अन्य २० जिल्ह्यांमध्ये समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त हे पुढील आदेशापर्यंत जिल्हा समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहे. विभागीय समिती बरखास्त करून जिल्हा समित्या स्थापन केल्या जाणार असल्याने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या कामाला वेग येणार आहे.