शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

जात पंचायतींना चाप

By admin | Updated: April 14, 2016 04:16 IST

सामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी जात पंचायतींच्या माध्यमातून चुकीचे काम करणा-या व्यक्तींना तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारे महाराष्ट्र

मुंबई : सामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी जात पंचायतींच्या माध्यमातून चुकीचे काम करणा-या व्यक्तींना तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारे महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण २०१६ हे विधेयक बुधवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले. मात्र, या विधेयकामुळे जात पंचायतींच्या विधायक कामांना धक्का लागणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या पूर्वसंध्येला सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण विधेयक एकमताने मंजूर करून विधीमंडळाने बाबासाहेबांना अभिवादन केले. हे विधेयक राज्यात सामाजिक न्यायाची नवी पहाट आणेल, असा विश्वास दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)गावकी बसवून न्याय देण्यास आता प्रतिबंधया विधेयकातील तरतुदीनुसार एखादी व्यक्ती वा समूहावर सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्यांना तीन वर्षे कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल. जात पंचायत अथवा गावकी बसवून न्याय देण्यास आता कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. असे करणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन मानले जाईल. जात पंचायतीने दंड सुनावणे, एखाद्याला वाळीत टाकणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. चांदगुडे यांचा लढा यशस्वीसामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायतींविरोधात लढा उभारला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक घटनांमधील आरोपींवर गुन्हे दाखल झाले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकमतने त्यांना महाराष्ट्रीयन आॅफ द ईयर पुरस्कारासाठी नामांकित केले होते. आजच्या विधेयकामुळे चांदगुडे यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे.विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधान परिषदेत गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी हे विधेयक मांडले. जातपंचायतीच्या माध्यमातून बहिष्कार घालण्याचे ६४ गुन्हे पाच वर्षात दाखल झाले. रायगड जिल्ह्यात यासंदर्भात ६३३ आरोपींना अटक झाली. अशा प्रकारांना आळा घालण्यास हा कायदा करण्यात आला आहे. या प्रकरणांत न्यायालयाने ठोठावलेल्या दंडाची रक्कम पीडितांना देण्यात यावी, अशी सूचना काँग्रेसच्या शरद रणपिसे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली.लोकमतचा पाठपुरावारायगड, नाशिक, नगर आणि परभणी जिल्ह्यातील जात पंचायतींच्या अघोरी व अमानवीय शिक्षेसंदर्भात लोकमतने सातत्याने आवाज उठवून या प्रकरणांचा पाठपुरावा केला होता. विशेषत: रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्काराच्या घटनांना वाचा फोडून सरकारचे लक्ष वेधले होते.