शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कॅशलेस व्यवहार ४० टक्क्यांनी घटले

By admin | Updated: April 12, 2017 01:35 IST

रोखीच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. अनेक बँका ई व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात

पुणे : रोखीच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. अनेक बँका ई व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत असल्याने, नागरिकदेखील हातचे राखूनच ई पेमेंट करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या. त्या वेळी रोकडरहित व्यवहार करण्यासाठी सरकारने आवाहन केले होते. मात्र, रोख रक्कमेची उपलब्धता वाढताच ई व्यवहारात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू झाली आहे. नोटाबंदीच्या काळात तब्बल दोन ते अडीच महिने सरासरी ८० टक्के व्यवहार हे नेट बँकिंग, क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून होत होते. हे प्रमाण आता सुमारे चाळीस टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यातच विविध बँकांनी आपल्या व्यवहारांवर भरघोस शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक बँकांचे हे दर वेगवेगळे आहेत. हॉटेलिंग, पेट्रोल, कपडे अशा व्यवहारांनुसार दर आकारले जात आहेत. पट्रोलच्या प्रत्येक व्यवहारासाठी ६ ते १४ रुपयांपर्यंत रक्कम आकारली जात आहे. त्यामुळे नागरिकही व्यवहाराचा प्रकार आणि निकड या नुसार ई व्यवहारांना पसंती देत आहेत. विविध बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कर्जाचे दर जाहीर करतात. त्यासाठी विविध योजनाही असतात. याच बँकांनी ई व्यवहारांना चालना देण्यासाठी आम्ही किती शुल्क आकारतो, हे मात्र जाहीर केले जात नाही. कोणत्या बँकेमध्ये दर्शनी भागात अशा शुल्काचे दरपत्रक लावल्याचे आढळून येत नसल्याचा खातेदारांचा अनुभव आहे. सराफी व्यावसायिक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘सोन्या चांदीच्या खरेदीसाठी ३० टक्के व्यवहार ई पेमेंट, धनादेश याद्वारे होतात. यात सरासरी २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.’ मात्र, काही सराफी व्यावसायिकांनी १० टक्के व्यवहारही ई पेमेंटद्वारे होत नसल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. (प्रतिनिधी)नोटाबंदीच्या काळात ८० टक्क्यांपर्यंत विविध कार्डद्वारे पैसे अदा केले जायचे. मात्र, आता ३० टक्केच व्यवहार कार्डद्वारे होत आहेत. आता पुन्हा रोखीनेच व्यवहार होत आहेत. विविध बँका ८ ते १४ रुपयापर्यंत एका व्यवहारामागे शुल्क आकारात आहेत. त्यामुळे नागरिक पुन्हा रोख व्यवहारांकडे वळत आहेत. - बाबा धुमाळ, अध्यक्ष आॅल इंडिया पेट्रोल अँड डीलर्स असोसिएशनकपडे खरेदीत पूर्वी ६५ टक्क्यांपर्यंत कार्डपेमेंट होते. त्यात आता ६५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. कार्डपेमेंट वाढले असले, तरी नागरिक हातचे राखूनच खरेदी करताना दिसत आहेत. - दिनेश जैन, कपडे व्यापारी