शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

एटीएममध्ये रोकड टंचाई

By admin | Updated: April 6, 2017 06:16 IST

नोटांची टंचाई निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट दिसत आहे.

मुंबई : नोटांची टंचाई निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट दिसत आहे. तीन-चार एटीएममध्ये जाऊनही रोख रक्कम मिळत नसल्याने लोकांचे हाल होत असून सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे. लोकांना ‘कॅशलेस’ व्यवहारास भाग पाडण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून नोटांचा पुरवठा होत नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप बँक कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास उटगी यांनी केला आहे.उटगी म्हणाले की, नोटबंदीनंतर काही एटीएममधील ‘कॅश रिकॅलिब्रेशन सिस्टम’मध्ये बदल करण्यात आला. मात्र अद्याप बहुतेक एटीएममध्ये नव्या २ हजार आणि पाचशे रुपये किंमतीच्या नोटांसाठी आवश्यक सॉफ्टवेअर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे मोजकेच एटीएम सुरू आहेत. त्यात ‘आरबीआय’कडून पुरेसा नोटांचा पुरवठा होत नसल्याने नोटाबंदीनंतर सुरू केलेले एटीएमही बंद होत आहेत. ‘आरबीआय’ने रोखून ठेवलेल्या नोटांमुळे लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लोकांना कॅशलेसकडे नेण्यासाठी ‘आरबीआय’ आणि सरकारकडून जाणीवपूर्वक नोटांची टंचाई निर्माण होत असल्याचा गंभीर आरोपही उटगी यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लोकांचा कॅशलेसवर अद्याप पूर्ण विश्वास नाही. तरीही लोकांना जबरदस्तीने कॅशलेस व्यवहारांना भाग पाडण्यासाठी सरकार नोटांची टंचाई निर्माण करत असल्याचा आरोपही उटगी यांनी केला आहे.तर ‘आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’चे सहसचिव देविदास तुळजापूरकर म्हणाले की, राज्यात शेतीच्या कामांसह लग्नसराईचा जोर आहे. त्यात सरकारने बँक आणि एटीएममधून काढण्यात येणाऱ्या पैशांच्या मर्यादेवरील सर्व बंधने उठवली आहेत. परिणामी, एटीएमवर अधिक भार पडत आहे. अशा परिस्थितीत गेल्या आठवड्याभरात आलेल्या सुट्ट्यांमुळे बँक अधिक वेळ बंदच होत्या. त्यामुळे नोटांची टंचाई झाली आणि एटीएममध्ये कमी रोख रक्कम भरल्याने आता टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एटीएममधील नोटटंचाईच्या निषेधार्थ विदर्भात काही ठिकाणी शिवसैनिकांनी एटीएमची आरती करत आंदोलनही केले. (प्रतिनिधी)>बँकांना दंड लावा!एटीएम वापरावरील निर्बंधासाठी आरबीआयने काही राष्ट्रीयीकृत बँकांना ठराविक वापरानंतर ग्राहकांकडून दंड वसुलीस परवानगी दिली होती. मात्र आता गरजेच्या वेळी बँक एटीएम सेवा पुरवण्यात असमर्थ ठरत असल्याने बँकांनाही दंड लावण्याची मागणी तुळजापूरकर यांनी केली आहे.