शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

कांदळवन नष्ट करणाऱ्या ६० जणांविरूद्ध अखेर गुन्हे दाखल

By admin | Updated: November 4, 2016 05:09 IST

६०० हेक्टरवरील कांदळवनापैकी बहुतांश ठिकाणच्या कांदळवनाचा नाश रेतीमाफियांसह बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांनी केला आहे.

ठाणे : जिल्ह्यातील खाडी किनारच्या सुमारे एक हजार ६०० हेक्टरवरील कांदळवनापैकी बहुतांश ठिकाणच्या कांदळवनाचा नाश रेतीमाफियांसह बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांनी केला आहे. या वनाच्या संवर्धनासाठी न्यायालयीन आदेशानंतर महाराष्ट्र राज्य राजपत्रातदेखील वनसंवर्धन घोषीत केले होते. यानुसार कांदळवन नष्ट करणाऱ्या सुमारे ६० जणांवर गुन्हे दाखल केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. याशिवाय कांदळवनाचा नाश करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करून त्यांविरु द्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.नवी मुंबई तसेच भिवंडी, ठाणे तालुक्यातील कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला प्राधान्य देऊन कांदळवनावरील अतिक्र मण किंवा त्याचा नाश करण्यात येत असलेल्या तक्र ारींची तातडीने दाखल घेऊन संबधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. याशिवाय कांदळवनाच्या जागांवर कोणत्याही परिस्थितीत कचरा टाकू नये, अशाही सूचना जिल्ह्यातील महापालिकांना दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी नुकतीच प्रांताधिकारी व तहसीलदारांची बैठक घेतली आहे. गुन्हे दाखल केलेल्यामध्ये नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा भार्इंदर या भागातील कांदळवन व जागा नाश करणाऱ्यांचा समावेश आहे. भिवंडी तालुक्यातील शासकीय जमिनीवरील कांदळवन व्याप्ती सुमारे १३७ हेक्टरची आहे. वन संरक्षित (अधिसूचित) करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. ठाणे तालुक्यातील शासकीय जमिनीवरील कांदळवन व्याप्त क्षेत्र सुमारे १४७१ हेक्टर असून ते संरक्षित करण्यासह त्याची अंतिम अधिसूचना काढण्याची कार्यवाही सुरु आहे.(प्रतिनिधी)>कांदळवनाचा ऱ्हास थांबवण्यासाठी लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले होते. या ठिकाणच्या खारफुटीच्या संरक्षणाची जाणीव त्याना वेळीच झाली असती तर शेकडो एकरमधील कांदळवनाचा बचाव करता आला असता. पण ती आमची जबाबदारी नसून वनविभाग, समाजिक वनीकरण तर कधी मेरी टाईम बोर्डची जबाबदारी असल्याचे उत्तर तेव्हा मिळाले होते. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन दोषींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.