शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

औरंगाबादमध्येही ‘वाळीत’ प्रकरण

By admin | Updated: January 9, 2015 01:47 IST

रायगड जिल्ह्णापाठोपाठ आता औरंगाबाद येथेही वाळीत प्रकरण उघडकीस आले आहे़ एकाच जातीतील, एकाच गोत्रातील तरुणासोबत प्रेमविवाह केला.

औरंगाबाद : रायगड जिल्ह्णापाठोपाठ आता औरंगाबाद येथेही वाळीत प्रकरण उघडकीस आले आहे़ एकाच जातीतील, एकाच गोत्रातील तरुणासोबत प्रेमविवाह केला. तरीही कंजारभाट समाजाच्या एका दाम्पत्याबरोबरच त्यांच्या आई, वडील, भावांना जातपंचायतीने आठ वर्षांपासून समाजातून बहिष्कृत केले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या दाम्पत्याने जातपंचायतीला दंडाच्या रूपात आतापर्यंत १ लाख ७० हजार रुपयेही दिले; तरीही बहिष्कार मागे घेण्यात आला नाही. अखेर या दाम्पत्याने सिडको एमआयडीसी ठाण्याचे दार ठोठावले आणि गुन्हा दाखल करण्यात आला. जाधववाडीतील सिद्धेश्वर कॉलनीतील रंजना सचिन पांडे (३५) यांना २००२ मध्ये तिच्या पहिल्या पतीने सोडून दिले. त्यानंतर ती एकटीच राहत असताना तिची नारेगावातील विशाल तामचीकर याच्याशी ओळख झाली. दोघे एकाच समाजाचेच. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातूनच त्यांना एक मुलगी झाली. घरच्यांची मान्यता असतांना समाजाला ही बाब खुपली. कंजारभाट समाजातील रूढीनुसार एकाच गोत्रातील तरुण-तरुणीचा विवाह होऊ शकत नाही. हे समाजाच्या परंपरेविरोधात आहे. त्यामुळे तुम्हाला बहिष्कृत करण्यात येत आहे’ असा निर्णय घेऊन या दोघांबरोबरच त्यांच्या आई- वडील, भावांच्या कुटुंबालाही पंचायतीने वाळीत टाकले. (प्रतिनिधी)पावणेदोन लाख उकळले!२००६ मध्ये जातपंचायतीत हा विषय ठेवण्यात आला. तेव्हा पंचायतीने या दोघांना गुन्हा केला म्हणून आधी दहा हजार रुपये दंड भरा, असा आदेश दिला. त्यांच्याकडून दहा हजार रुपये भरून घेतले. नंतर पुण्यातील पिंपरी-चिंचवड, आळंदी, इचलकरंजी, संगमनेर व औरंगाबाद याठिकाणी भरविण्यात आलेल्या वेगवेगळ्या जातपंचायतींमध्ये दंडापोटी म्हणून दोघांकडून आतापर्यंत १ लाख ७० हजार रुपये वसूल करण्यात आले; तरीही बहिष्कार मागे घेण्यात आला नाही. जातपंचायतीविरुद्ध बंडअनेकदा विनवण्या करून, दंड भरूनही जातपंचायत बहिष्कार मागे घेण्यास तयार होईना, म्हणून रंजना आणि विशालने समाजाविरुद्ध बंड पुकारण्याचा निर्णय घेतला आणि बुधवारी अखेर तिने सिडको एमआयडीसी ठाणे गाठले व जातपंचायतीविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून कंजारभाट जातपंचायतीचे महाराष्ट्र- कर्नाटक अध्यक्ष कविचंद भाट, औरंगाबादेतील पंचकमिटी सरपंच संपत मलके, उपसरपंच रतनू मलके, संजू तामचीकर, गोकुळ मलके, चरण माचरे, काळूराम मलके, बलबीर रावळकर, रामू इंद्रेकर, मजनू तामचीकर, धारासिंग माचरेकर (रा. सर्व नारेगाव, भाटनगर गल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी सांगितले.