कारंजा लाड (जि. वाशिम): छेडखानीच्या वादातून शहरात लागलेल्या संचारबंदीमुळे जनजिवन प्रभावित झाले होते. जिल्हा प्रशासनाने शहरात १४ जुलैपासून लागू केलेली संचारबंदी २२ जुलै रोजी पुर्णत: उठविण्यात आली. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधिात राहावी याकरीता खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, संचारबंदी पूर्णवेळ शिथिल करण्यात आल्याने शहरवासींचे जनजीवन पूर्वपदावर आले असून दि. २२ पासून शहरातील शाळा व महाविद्यालयही विद्याथ्यार्थीनी गजबजलेले होते.
कारंजातील संचारबंदी हटविली
By admin | Updated: July 22, 2015 23:29 IST