शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

काळजी मराठवाड्याची

By admin | Updated: September 18, 2016 03:21 IST

लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या भाषणातून औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या जिव्हाळ्याचा प्रत्यय आला.

लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या भाषणातून औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या जिव्हाळ्याचा प्रत्यय आला. औरंगाबाद ते पैठण या ४५ किलोमीटर रस्त्याच्या दुर्दशेची कहाणी मुंबईत आयोजित ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’मध्ये लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी समोर आणली. पैठण ही संतांची भूमी, राज्यातील सर्वांत मोठे जायकवाडी धरण या ठिकाणी आहे. मात्र, ४५ कि.मी.चे अंतर कापायला दीड तास लागतो. आपल्या पायाभूत सुविधा किती कमकुवत आहेत, याचे हे उदाहरण आहे. लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह सुरू होण्यापूर्वी केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले की, औरंगाबाद ते पैठण रस्त्याला जरी महामार्गाचा दर्जा देण्यात आला असला तरी कन्सल्टन्ट नियुक्तीची फाईल ३ महिन्यांपासून दिल्लीत प्रलंबित आहे. ना. नितीन गडकरी यांनी तातडीने या विषयात लक्ष घालू आणि लवकरच या कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन दिले. पायाभूत सुविधा आणि विकास ही रथाची दोन चाके आहेत. पायाभूत सुविधा असल्या की विकास कसा होतो, हे आम्ही जवळून पाहिले आहे. ते पुढे म्हणाले की, औरंगाबाद - जालना मार्ग गेल्या काही वर्षांपासून चांगला तयार केला आहे. त्यामुळे या मार्गावर समृद्धी दिसते. मात्र, दुसऱ्या बाजूला औरंगाबाद-पैठण मार्गावर बिडकीन येथे दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरसाठी (डीएमआयसी) ८,५०० एकरांपेक्षा जास्त जमीन संपादित केली आहे. या जमिनीचा मोबदलाही शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र, औरंगाबाद ते बिडकीन हे अवघ्या २३ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी एक तास लागत असेल, तर भविष्यात ही औद्योगिक वसाहत विकसित होईल तरी कशी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विचारांशी मी सहमत आहे, लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, असे आश्वासन दिले.