शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

विषम परिस्थितीवर मात करण्याची महिलांमध्ये क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:37 IST

सध्या तंत्रज्ञान आणि समाजावर होणाºया बदलांचा परिणाम व्यवसायावर आणि त्याच्या कल्पकतेवर होत आहे. महिला उद्योजिकांमध्ये व्यवसायाचे कौशल्य असते.

ठळक मुद्देतज्ज्ञांचा सूर : व्हीआयए महिला विंगतर्फे उद्योजिकांसाठी कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या तंत्रज्ञान आणि समाजावर होणाºया बदलांचा परिणाम व्यवसायावर आणि त्याच्या कल्पकतेवर होत आहे. महिला उद्योजिकांमध्ये व्यवसायाचे कौशल्य असते. त्यांनी बाहेरील मदतीची वाट न पाहता स्वत:मध्ये असलेल्या कौशल्याने उद्योगाचा विकास करावा, असा सूर या क्षेत्रातील तज्ज्ञांनी येथे काढला.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) महिला विंगतर्फे उद्योग भवन, सिव्हिल लाईन्स येथील व्हीआयएच्या सभागृहात ‘महिला उद्योजिका व २०३० : भविष्यात तयारीची मूळ स्थिती’ आणि ‘महिला उद्योजिकांची स्थिती, सहकार्य व यश’ या विषयांवर दोन कार्यशाळांचे आयोजन गुरुवारी करण्यात आले.पहिल्या कार्यशाळेत व्हीआयए अ‍ॅग्रो व फूड प्रोसेसिंग फोरमचे चेअरमन व रास फ्रोजन फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक अरुण खोब्रागडे यांनी तर दुसºया कार्यशाळेत इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या (आयएमटी) प्रा. डॉ. स्मिता दाभोळकर-सिंग आणि डॉ. अभिषेक सिंग यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व्हीआयए महिला विंगच्या अध्यक्षा साची मलिक यांनी केले. संचालक सहसचिव रश्मी कुळकर्णी यांनी तर सचिव रिता लांजेवार यांनी आभार मानले. यावेळी व्हीआयएचे कोषाध्यक्ष गिरीश देवधर, महिला विंगच्या माजी अध्यक्षा व सल्लगार सरला कामदार यांच्यासह महिला उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.व्यवसायात विशिष्टता आणावी : अरुण खोब्रागडेअरुण खोब्रागडे म्हणाले, दुसरा करतो म्हणून मी करतो, हे चुकीचे आहे. व्यवसायात विशिष्टता आणावी लागेल. पूर्वी व्यवसाय करताना बाजारपेठेची निवड करावी लागायची, पण आता बाजारपेठ मोबाईलवर गेली आहे. शेजारच्या दुकानाची तुलना आता तुम्हाला करता येणार नाही. व्यवसायात विशिष्टता ठेवणे गरजेचे झाले आहे. व्यवसाय वाढीसाठी अ‍ॅमेझॉनने हेच केले. नागपूरचे उदाहारण द्यायचे झाल्यास संतोष पकोडेवाला आणि कस्तूरचंद पार्क येथील पोहेवाल्याने व्यवसायात विशिष्टता (युनिकनेस) आणल्यामुळे शहराच्या कानाकोपºयातील ग्राहक त्यांच्याकडे येतात. त्यामुळेच त्यांच्या व्यवसायाने तग धरला आहे. असे व्यवसाय दीर्घकाळ टिकतात, असे अरुण खोब्रागडे म्हणाले.स्वत:ची ओळख निर्माण करा : डॉ. स्मिता दाभोळकर-सिंगमहिला उद्योजिकेला स्वत:ची ओळख निर्माण करणे आवश्यक आहे. व्यवसाय तुम्ही स्व:खुशीने करता वा नाईलाजाने करता आहात, हे प्रारंभी पाहावे. यश मिळाले नाही तर दु:खी होता. तुम्ही जे काम करीत आहात, त्याचे नियंत्रण कुठे आहे, हे तपासून पाहावे. बाहेरून पाठिंबा घेण्याची गरज नाही, ते उद्योजिकेत असतेच. परिश्रमाने स्वत:ची ओळख निर्माण करा, असा सल्ला इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या (आयएमटी) प्रा. डॉ. स्मिता दाभोळकर-सिंग यांनी दिला.आव्हानांवर मात करा : डॉ. अभिषेक सिंगशिक्षित पण रोजगारापासून अनेक वर्षे दूर असलेल्या महिलांना शासकीय योजनांची माहिती नसते आणि ते कुणीही सांगत नाही. उद्योग सुरू केलेल्या १०० पैकी ९० महिलांना पाठिंबा नसतो. त्यावर संशोधन केले आहे. तणाव हे मुख्य कारण आहे. महिलांना अनेक बंधने आणि आव्हाने असतात. त्यावर मात करून व्यवसाय करा, पैसा मिळवा, असे आवाहन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीचे (आयएमटी) प्रा. डॉ. अभिषेक सिंग यांनी केले. त्यांनी दंगल चित्रपटातील कुस्तीचा संदर्भ आणि चीनमधील अलीबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांच्या प्रगतीची माहिती दिली.