शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

‘जलमित्र’ अभियानास ‘कॅनन’ची साथ!

By admin | Updated: May 18, 2016 02:24 IST

‘जलमित्र’ अभियानात दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पावभाजी सेंटर ‘कॅनन’ने साथ दिली आहे

मुंबई : ‘लोकमत’ने पाणीबचतीसाठी राज्यभर सुरू केलेल्या ‘जलमित्र’ अभियानात दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पावभाजी सेंटर ‘कॅनन’ने साथ दिली आहे. दररोज हजारो खवय्ये येणाऱ्या ‘कॅनन’ने ‘लोकमत-जलमित्र’ अभियानांतर्गत पाणी वाचवण्याची मोहीम सुरू केली आहे.छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे बहुतेक प्रवासी ‘कॅनन’चा स्टॉप घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. पावभाजी, वडापाव अशा नानाविध पदार्थांची चव चाखल्यानंतर घाईघाईतच खवय्ये जमेल तितके पाणी पिऊन पुढील कामासाठी धाव घेतात. या गडबडीत बहुतेक खवय्ये अर्धाच ग्लास पाणी पित असल्याचे ‘लोकमत’च्या निदर्शनास आले होते. उरलेल्या अर्धा ग्लास पाण्याची माहिती घेतली असता, हे पाणी वॉश बेसिनमध्ये ओतत असल्याचे समजले. त्यामुळे हजारो लीटर पाणी रोज वॉश बेसिनमधून नाल्यामध्ये जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, ‘लोकमत’ने कॅननचे चालक अप्पा दांडेकर यांची भेट घेत, जलमित्र अभियानाबाबत माहिती दिली. अप्पांनीही या अभियानात सामील होण्यास होकार दर्शविला. प्रत्येक खवय्याला पाण्याचे महत्त्व पटावे, म्हणून कॅननच्या कट्ट्यावर पाणीबचतीचे संदेश देणारे टेंटकार्ड ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, कॅननसमोर पाणीबचतीसाठी ड्रम ठेवण्यात आला आहे. या ड्रममध्ये खवय्यांच्या ग्लासमध्ये उरलेले पाणी साठवण्यात येईल. शिवाय, या पाण्याचा पुनर्वापर जास्त खराब झालेली भांडी प्राथमिक स्वरूपात साफ करण्यासाठी होईल. त्यानंतर, स्वच्छ पाण्याने भांडी पुन्हा साफ करता येतील. त्यामुळे भांडी घासण्यासाठी कमीत कमी स्वच्छ पाणी लागेल, शिवाय वाया जाणाऱ्या पाण्याचाही पुनर्वापर होईल.