शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

आमदार नसलेल्या जिल्ह्यांमध्ये उमेदवारी

By admin | Updated: May 25, 2016 02:15 IST

ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपाचा एकही आमदार नाही अशाच जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे,

- यदु जोशी,  मुंबईज्या जिल्ह्यांमध्ये भाजपाचा एकही आमदार नाही अशाच जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे,अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. उस्मानाबाद, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये भाजपाचा एकही आमदार २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ शकला नव्हता. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन या जिल्ह्यांमध्ये पक्ष बळकट करण्याचा एक भाग म्हणून या चार जिल्ह्यांपैकी दोन जिल्ह्यांतच विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ १२३ आहे. त्यांचे चार आमदार सहज निवडून येतील. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाला राजकीय कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आमचा पाचवा उमेदवार निश्चितपणे जिंकेल, असा विश्वास आधीच व्यक्त केला आहे. रत्नागिरीमधून माजी आमदार बाळ माने, सिंधुदुर्गमधून माधव भंडारी, अतुल काळसेकर व प्रमोद जठार, उस्मानाबादमधून मिलिंद पाटील, सुजितसिंह ठाकूर, सातारामधून अतुल भोसले ही संभाव्य नावे आहेत. भाजपा आपल्या दोन जागांव्यतिरिक्त इतर तीन जागा मित्र पक्षांना देणार आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची नावे निश्चित मानली जातात. रिपाइंतर्फे अविनाश महातेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. ते पक्षाध्यक्ष खा.रामदास आठवले यांचे निकटवर्ती मानले जातात.