शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात मेणबत्ती मोर्चा

By admin | Updated: November 8, 2016 02:18 IST

वृत्तवाहिनीवरील बंदी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. सरकारची दडपशाही आहे. प्रबोधनाचे काम लोकशाहीचा चौथा स्तंभ करत असतो

ठाणे : वृत्तवाहिनीवरील बंदी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. सरकारची दडपशाही आहे. प्रबोधनाचे काम लोकशाहीचा चौथा स्तंभ करत असतो. त्यांनी कसे वागावे अथवा वागू नये ते सरकारला ठरवता येणार नाही. पत्रकारांना शांत बसवण्याची पद्धत १९३२ साली हिटलरने अवलंबली होती. आणीबाणीतही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अशीच गळचेपी झाली होती. हे केंद्रातील भाजपा सरकारने लक्षात घ्यावे. सरकारने वेळीच धडा घेतला नाही तर जनता यांनाही धडा शिकवेल, असा सूर सोमवारी ठाण्यात काढलेल्या मेणबत्ती मोर्चाद्वारे व्यक्त झाला. हा मोर्चा सुरू असतानाच वृत्तवाहिनीवरील बंदी मागे घेतल्याचे वृत्त समजले.एका वृत्तवाहिनीवर आणलेल्या बंदीच्या निषेधार्थ सोमवारी ठाण्यातील नागरिकांनी एकत्र येत गडकरी रंगायतन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर मेणबत्ती मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व महिलांनी केले. हातात मेणबत्त्या घेऊन आणि हाताला काळ्या फिती बांधून ठाणेकरांनी निषेध नोंदवला. डोन्ट किल फ्रीडम आॅफ स्पीच, डोन्ट किल फ्रीडम आॅफ एक्सप्रेशन, डोन्ट किल इंडियन कॉन्स्टिट्युशन असे घोषफलक या मार्चमध्ये पाहायला मिळाले. यावेळी निवृत्त न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल, डॉ.राम माळी, ऋता आव्हाड, डॉ.अभिजीत वैद्य, आनंद परांजपे, नगरसेवक संजय भोईर, सुहास देसाई, अमित सरैय्या तसेच शानू पठाण, उपस्थित होते. (प्रतिनिधी)