शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

आधारकार्डशिवाय परीक्षा अर्ज भरता येणार

By admin | Updated: October 17, 2016 00:57 IST

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करताना आधारकार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला होता.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करताना आधारकार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला होता. मात्र त्यास विरोध होऊ लागल्याने आधारकार्ड नसेल, तर आधारकार्डसाठी अर्ज केलेला नोंदणी क्रमांकही स्वीकारला जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजूनही आधारकार्ड न काढलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना आधारकार्ड बंधनकारक केले होते. परंतु, आधारकार्ड सक्तीस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विरोध केला. तसेच मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव व विक्रांत अमराळे यांनी आधारकार्ड सक्ती रद्द करावी, अशी मागणी राज्य मंडळाकडे केली. त्यावर मंडळातर्फे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>परीक्षा अर्ज भरताना आधारकार्ड अनिवार्य केले असले तरी एखाद्या विद्यार्थ्याकडे आधारकार्ड नसेल, तर आधार नोंदणी क्रमांक परीक्षेसाठी ग्राह्य धरला जाईल. आधारकार्डसाठी अद्याप नोंदणी केलेली नसेल तर निकालापर्यंत आधारकार्ड काढण्यात येईल, असे संबंधित विद्यार्थ्यांनी प्राचार्य अथवा मुख्याध्यापकांकडे लेखी देणे आवश्यक आहे.आधारकार्र्ड नसले तरीही परीक्षा अर्ज भरता येणार आहे, असे राज्य मंडळाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.