शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

आरक्षणाच्या आधारे दिलेल्या बढत्या रद्द! हायकोर्टाचा निकाल; प्रशासकीय गोंधळ उडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 04:25 IST

महाराष्ट्र सरकारने गेल्या १३ वर्षांत विविध मागास प्रवर्गातील कर्मचा-यांना आरक्षणाच्या आधारावर दिलेल्या हजारो बढत्या मुंबई उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केल्या.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : महाराष्ट्र सरकारने गेल्या १३ वर्षांत विविध मागास प्रवर्गातील कर्मचा-यांना आरक्षणाच्या आधारावर दिलेल्या हजारो बढत्या मुंबई उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केल्या. यामुळे सरकारच्या सर्वच खात्यांमध्ये ज्येष्ठता याद्यांची उलथापालथ होऊन, मोठा प्रशासकीय गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.न्या.अनुप मोहता व न्या.अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने हा निकाल जाहीर करताच, मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी या निर्णयावर १२ आठवड्यांची स्थगिती देण्याची विनंती केली.राज्य सरकारला या निकालविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाता यावे, यासाठी न्यायालयाने आपला हा आदेश सरकारच्या विनंतीनुसार तीन महिन्यांसाठी तहकूब ठेवला. याकाळात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती किंवा अंतिम निर्णय मिळवू शकले नाही, तर या सर्व बढत्या रद्द होतील. परिणामी, बढत्या मिळालेल्यांना पुन्हा मूळपदांवर आणून गुणवत्तेवर नव्याने बढत्या द्याव्या लागतील.‘डेटा’ नसल्याने पंचाईत-भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १६ (४ ए) अन्वये सरकारला बढत्यांमध्ये आरक्षण लागू करण्याचा अधिकार आहे. मात्र, ज्यांना आरक्षण आहे, त्या मागास समाजवर्गाला संबंधित नोकºयांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही, तसेच या बढत्या दिल्याने प्रशासकीय कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होणार नाही, अशी खात्री होणारा ‘डेटा’ उपलब्ध असेल, तरच बढत्यांमध्ये असे आरक्षण देणे घटनासंमत ठरेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने एन. नागराज प्रकरणात दिला आहे. राज्य सरकारचा २५ मे २००४चा ‘जीआर’ नागराज प्रकरणातील निकालाच्या निकषात बसत नाही, असे म्हणून उच्च न्यायालयाने तो रद्द केला.पुढील बढत्यांची स्थिती सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या आणि विमुक्त जाती व विशेष मागास वर्ग यातील अधिकारी/कर्मचाºयांना या बढत्या दिल्या गेल्या असून, त्यांचे प्रमाण ३३ टक्के एवढे आहे. सुरुवातीस उच्च न्यायालयाने याचिकांवरील अंतिम निकालाच्या अधीन राहून, आरक्षणाने बढत्या देण्यास मार्च २००७मध्ये मुभा दिली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने मार्च २००८मध्ये या अंतरिम आदेशात सुधारणा करून, याचिकांच्या निकालाची अट शिथिल केली. आताही पुढील तीन महिने या सर्व बढत्यांची स्थिती सर्वोच्च न्यायालयाच्या २००८च्या निकालानुसार कायम राहील.कायदा, ‘जीआर’ दोन्ही घटनाबाह्य ठरविले-राज्य सरकारने २००१मध्ये बढत्यांचे आरक्षण लागू करणारा कायदा केला. त्यानुसार, उपर्युक्त मागासवर्गांना 33% आरक्षण लागू करणारा ‘जीआर’ २५ मे २००४ रोजी काढला गेला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकाराने (मॅट) नोव्हेंबर २०१४मध्ये मूळ कायदा व त्यानुसार काढलेला ‘जीआर’ हे दोन्ही घटनाबाह्य ठरवून रद्द केले. त्याविरुद्ध राज्य सरकार व मागासवर्ग संघटना उच्च न्यायालयात आल्या. या याचिकांवर निकाल देताना दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद झाले, म्हणून प्रकरण तिसºया न्यायाधीशांकडे गेले. अंतिमत: दोन विरुद्ध एक असा बहुमताने न्यायालयाने फक्त ‘जीआर’ रद्द केला. आरक्षणाच्या मूळ कायद्याची वैधता योग्य प्रमाणात योग्य वेळी तपासली जाईल. न्या. अमजद सय्यद व न्या. महेश सोनक यांनी ‘जीआर’ रद्द करण्याचा निकाल दिला. न्या. अनुप मोहता यांचे निकालपत्र अल्पमताने हटले.