शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

"कॅन्सरला कॅन्सल करा" उद्या कोल्हापुरात!

By admin | Updated: April 20, 2017 11:22 IST

"कॅन्सरला कॅन्सल करा" हे ब्रीद वाक्य घेऊन "लोकमत" आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने "एक जीवन स्वस्त जीवन" हा दहा दिवसांचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 20 - "कॅन्सरला कॅन्सल करा" हे ब्रीद वाक्य घेऊन "लोकमत" आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने "एक जीवन स्वस्त जीवन" हा दहा दिवसांचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यभरात विविध कार्यक्रमांव्दारे कर्करोगाबाबत जागृती करण्यात येत आहे. त्यापैकी कोल्हापूरात 21 एप्रिल रोजी  तज्ञ डॉक्टरांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. 
 
या परिसंवादात डॉक्टर्स,  फिजिशिअन्स, वैद्यकीय काउन्सलर्स, समाजसेवक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कर्करोगावर मात करुन नवीन आयुष्य सुरु करणारे अनेकजण या वेळी त्यांचे अनुभव उपस्थितांना सांगणार आहेत. 
 
कर्करोगाबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तसेच याबाबत स्वत:चे किंवा कुटुंबियांचे अनुभव कथन करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असा आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमाव्दारे पथनाटय, परिसंवाद, डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात नाशिक येथून झाली असून, नागपुरात त्याची सांगता होणार आहे. 
 
"लोकमत" आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग व त्यावरील उपचारांबाबत जनजागृती करण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून पथनाटय, सखी मंचचे कार्यक्रम, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि डॉक्टरांना प्रशिक्षण, अशा विविध कार्यक्रमांव्दारे  राज्यभरात कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी 9322144444 या क्रमांकावर मिस कॉल द्या किंवा लॉग ऑन करा www.ekjeevanswasthjeevan.in
 
कर्करोगाचा विळखा 
देशात कर्करोग हा सर्वात घातक आजार ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी भारतात सुमारे 10 लाख लोकांना कर्करोगाचे निदान होते. सन 2035 पर्यंत ही आकडेवारी 17 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. तरीही या आजाराबाबत लोकांमध्ये अजूनही भरपूर अज्ञान आहे. त्यामुळे बहुतेकदा तिस-या किंवा चौथ्या टप्प्यावर येईपर्यंत कर्करोगाचे निदान होत नाही आणि या टप्याप्यावर त्यावर उपचार करणे अतिशय कठीण होऊन जाते. वस्तुत: लवकर निदान झाल्यास, हा आजार बरा होण्याची शक्यता अधिक असते आणि त्यासाठी या रोगाबद्दल जागरुकता असणे महत्वाचे ठरते. 
 
परिसंवादातील मान्यवर 
प्रमुख पाहुणे - डॉ. कुणाल खेमणार, सीईओ जिल्हा परिषद कोल्हापूर 
सहभागी तज्ञ डॉक्टर्स - कोकिलाबेन रुग्णालयाचे प्रख्यात सर्जन डॉ.मनोज मूलचंदानी (सर्जिकल ऑन्कॉलॉजी)
डॉ. समीर तुळपुळे (जनरल हाइमॅटॉलॉजी)
पॅनलवरील डॉक्टर्स - डॉ. रवींद्र शिंदे ( अध्यक्ष आयएमए कोल्हापूर), डॉ. अरुण परिटेकर (आरोग्य अधिकारी, कोल्हापूर जि.प.) आणि डॉ. दीपक देवळापुरकर (जनस्वास्थय दक्षता समिती, कोल्हापूर)
 
नोंदणीसाठी संपर्क करा 
कोल्हापूर - सचिन - 9767264885
नाशिक - जया -  9850304132
नागपूर- प्रमोद - 9881748790